मुंबई, दि. २७ जानेवारी- राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. खरं म्हणजे हे सरकार दारुड्यांची काळजी घेत आहे. उद्याची पिढी बरबाद कशी होईल याची या सरकारला पर्वा दिसत नाही. शेतक-यांच्या भल्याच्या नावावर मुंबईत सुपर मार्केटमध्ये वाईन विकणे म्हणजे हा एक प्रकारचा व्यभिचार महाराष्ट्रातील जनतेसोबत हे सरकार करत आहे. बेवड्यांना समर्पित अशा प्रकारचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. ना मंदिरांची काळजी, ना शिक्षणासारख्या पवित्र मंदिरांची काळजी. ना तेथील लोकांची काळजी परंतु दारू विक्रेत्यांची आणि दारू पिऊन कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त करणा-यांना हे सरकार अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन देत आहे. हा निर्णय म्हणजे भरकटलेल्या सरकारने घेतलेला भरकटलेला निर्णय असल्याची जोरदार टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.
दारू पिऊन कुटुंब उध्वस्त करणा-यांना सरकारचे अप्रत्यक्ष प्रोत्साहन-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
Date:

