Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भारत आता दुर्बळ राहिलेला नाही, कुणी आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Date:

झज्जर-भारताकडे वक्र दृष्टीने बघणाऱ्या कुणालाही चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपली सशस्त्र दले पूर्णपणे सुसज्ज आहेत अशा शब्दात, संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी राष्ट्राला आश्वस्त केले आहे.  हरयाणात झज्जर इथे आज 13 नोव्हेंबर 2022 रोजी सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या  कार्यक्रमाला संबोधित करताना संरक्षण मंत्र्यांनी सांगितले  की राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे  लक्ष पूर्णपणे केंद्रीत आहे आणि भविष्यातील आव्हानांपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी लष्कराला अत्याधुनिक आणि स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांनी/उपकरणांनी शस्त्रसज्ज केले जात आहे. 

भारत आता दुर्बळ देश राहिलेला नाही;  आम्हाला शांतता हवी आहे, मात्र कुणी आम्हाला उपद्रव दिला तर आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, आपल्या सैनिकांनी हे वारंवार सिद्ध करुन दाखवले आहे.  2016 चा लक्ष्यभेदी हल्ला (सर्जिकल स्ट्राईक), 2019 चा बालाकोट हवाई हल्ला आणि गलवान खोऱ्यात आपल्या सैनिकांनी गाजवलेले शौर्य हे आपल्या पराक्रमाचा आणि सज्जतेचा सज्जड पुरावा आहेत,” असे  राजनाथ सिंह म्हणाले.

वसाहतवादी मानसिकतेपासून मुक्त होण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, असेही संरक्षण मंत्र्यांनी सांगितले.

झज्जर इथे आज झालेल्या या कार्यक्रमात, संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते महान लढवय्या राजा पृथ्वीराज चौहान यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले.  पृथ्वीराज चौहान हे  एक महान शासक  होते, त्यांनी केवळ मोठ्या प्रदेशावर  राज्यच केले असे नाही तर ते शौर्य, न्याय आणि लोककल्याणाचे प्रतीक देखील होते, अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी पृथ्वीराज चौहान यांचा गौरव केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अजित पवारांबरोबर नाहीच , महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, खुद्द शरद पवारांची मान्यता – प्रशांत जगताप

पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस...

कोर्टाच्या आवारातच महिलेवर कारमध्ये सामूहिक अत्याचार

ठाणे- आर्थिक विषमता , सामाजिक विषमता या बरोबर ...