राजस्थानमध्ये आणि पंजाबमध्ये शेतातील कचरा जाळण्याच्या घटनांमध्ये वाढ त्यामुळे दिल्ली प्रदूषित -केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह 

Date:

नवी दिल्ली- दिल्लीतील हवेची गुणवत्ता सलग पाचव्या दिवशी ‘अतिशय वाईट ‘ श्रेणीत राहिल्यामुळे प्राथमिक शाळा सक्तीने बंद ठेवायला लागल्या आहेत,याबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत,केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान;  पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी सावध केले आहे की वायू प्रदूषणाशी संबंधित शेतातील कचरा जाळण्याच्या घटनांमध्ये राजस्थानमध्ये 160% आणि पंजाबमध्ये 20% वाढ झाली आहे. ते पुढे म्हणाले, याचा अर्थ असा होतो की दोन्ही राज्यांतील सरकार अशा प्रकारचा कचरा जाळणे थांबविण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नाहीत आणि त्यामुळे दिल्ली एनसीआरमधील हवेची गुणवत्ता सतत ढासळत आहे.

भू- विज्ञान मंत्रालयाच्या  भारतीय हवामान विभागाचेही डॉ जितेंद्र सिंह प्रभारी आहेत, ते यासंदर्भात म्हणाले की, दुसरीकडे, हरियाणा आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांत अशा प्रकारच्या  घटनांमध्ये लक्षणीय  घट नोंदविण्यात आली  आहे.

2018-19 पासून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार, केंद्र सरकारने 3,138 कोटी रुपये राज्यांना शेतातील कचरा व्यवस्थापनासाठी दिले आहेत, त्यापैकी जवळपास 1,500 कोटी रुपये केवळ पंजाबला देण्यात आले आहेत,असे डॉ जितेंद्र सिंह यांनी निदर्शनास आणून दिले.

दिल्लीत या वर्षी ऑक्टोबरमध्ये “अतिशय खराब” हवेची गुणवत्ता सतत 7 दिवस नोंदवली गेली आहे, याउलट  ऑक्टोबर 2021 मध्ये असे एकही प्रकरण आढळले नाही, असा इशाराही त्यांनी  दिला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...