दुबईच्या वर्ल्ड एक्स्पो, 2020 मधील सूक्ष्म-मध्यम-लघु उद्योग मंडपाचे उद्घाटन, ‘खादी इंडिया’ चित्रपट प्रदर्शित

Date:

नवी दिल्ली – एमएसएमई म्हणजे सूक्ष्म-मध्यम-लघु उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्यमंत्री भानुप्रताप सिंग वर्मा, तसेच मंत्रालयाचे सचिव बी बी स्वैन आणि खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज दुबईच्या वर्ल्ड एक्स्पो, 2020 मधील एमएसएमई मंडपाचे उद्घाटन झाले. यावेळी दुबईचे वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. मानवी प्रतिभेची झेप आणि मानवाला निरनिराळ्या बाबतीत मिळालेले यश साजरे करण्यासाठी जगातील लक्षावधी लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने ‘वर्ल्ड एक्स्पो, 2020 दुबई’ हा मेळावा भरवण्यात आला आहे. मनामनांना जोडून उज्ज्वल भवितव्याची निर्मिती करण्याच्या उद्देशाने, ‘कनेक्टिंग माइंड्स, क्रिएटिंग फ्युचर्स’ अशी या मेळाव्याची मध्यवर्ती संकल्पना आखण्यात आली आहे. भारतातील एमएसएमई उद्योगांसाठीची व्यवस्था आणि वातावरण मांडून विविध देशांच्या सरकारांशी तसेच उद्योग व व्यापार जगतातील नेतृत्वाशी संवाद साधता यावा, या क्षेत्रात जगभर अंमलात असलेल्या चांगल्या कार्यपद्धती आणि संकल्पनांची देवाणघेवाण करता यावी, या उद्देशाने एमएसएमई मंत्रालयाने सदर मेळाव्यात भाग घेऊन मंडप उभारला आहे.

केव्हीआयसी म्हणजे खादी ग्रामोद्योग आयोग निर्मित ‘खादी इंडिया’ या चित्रपट यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. उद्घाटनपर भाषणात राणे यांनी, रोजगारनिर्मिती आणि उत्पादन क्षेत्राच्या विस्तारासाठी एमएसएमई क्षेत्राकडून मिळत असलेल्या भरीव योगदानाचे कौतुक केले. आज या क्षेत्रातील 6 कोटींपेक्षा अधिक उत्पादन एककांमध्ये 11 कोटींपेक्षा अधिक व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. आर्थिक विकासात या क्षेत्राचे योगदान मोठे आहे. जीडीपी म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात या क्षेत्राचे 30% हून अधिक योगदान आहे. तर भारतातून होणाऱ्या एकूण निर्यातीत 48% वाटा या क्षेत्राचा आहे. देशातील एमएसएमई उद्योगांना आवश्यक असणाऱ्या – निर्यात, उत्पादनाची गुणवत्ता, जीडीपीमधील योगदान आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा तसेच अद्ययावत तंत्रज्ञान याबाबतच्या सुविधा पुरवून देशभरातील एमएसएमई उद्योगांसाठी नवे मापदंड तयार करण्याचा मंत्रालयाचा उद्देश आहे.

एमएसएमई क्षेत्राला अधिक गती देण्यासाठी मंत्रालयाकडून अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले जात आहेत, असे राज्यमंत्री भानुप्रताप वर्मा यांनी सांगितले. पतसुविधा, क्षमताबांधणी, कौशल्य प्रशिक्षण, बाजारपेठेशी जोडून देणाऱ्या दुव्यांची सुविधा व संपर्क, तंत्रज्ञानात नवे बदल आदी विषयांमध्ये वेगाने काम करून या उद्योगांच्या सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.

रायफल शूटिंगमध्ये अप्रतिम आशिष ढेंगे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

पुणे- इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अप्रतिम आशिष ढेंगे...

मुसळधार पावसाने दुबई ची तुंबई….विमानोड्डाणं रद्द…..प्रवाशी अडकले….

दुबईला गेलेले भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले .... पुणे- गेली...