गेल्या २५ वर्षांमध्ये मुंबईला खड्ड्यात घालण्याचे काम शिवसेनेने केले- आ.मंगल प्रभात लोढा

Date:


मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची लढाई सत्तेसाठी नव्हे तर विकासासाठी!

मुंबई भाजपाची कार्यकारिणी बैठक संपन्न
मुंबई- महानगरपालिकेच्या निवडणुकीची लढाई ही सत्तेसाठी किंवा आपला महापौर बसवण्यासाठी नसून मुंबईकरांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी ही लढाई असल्याचे प्रतिपादन मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत केले.
मुंबई भाजपाची कार्यकारिणी बैठक दादरमधील वसंत स्मृती मुंबई भाजपा कार्यालयामध्ये पार पडली. या बैठकीचे प्रास्ताविक मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार श्री. मंगल प्रभात लोढा यांनी केले. त्यावेळी मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, मुंबई सरचटणीस व आमदारअमित साटम, मुंबई सरचटणीस संजय उपाध्याय, विधान परिषद विरोधी पक्षनेतेप्रविण दरेकर, खासदार मनोज कोटकजी, खासदार गोपाळ शेट्टी, चिटणीसप्रतिक कर्पे तसेच खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.  
त्यावेळी मंगल जी म्हणाले की, पंतप्रधान म्हणून आपल्याला मोदीजींसारखे उत्तम नेतृत्त्व लाभलं आहे. या सात वर्षांत त्यांनी जी विकासात्मक पावलं उचलली आहेत असे कोणीही करू शकत नाही.आणि तसाच विकास आपल्या मुंबईत करायचा आहे. त्याकरीता आपल्याला ताकदीने उभे राहायचे आहे. गेल्या २५ वर्षांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला असून मुंबई शहराला आणि मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचे काम हे मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने केलेले आहे. त्यामुळे मुंबईचा विकास करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आणायची आहे. मुंबईकरांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी ही लढाई असल्याचा संकल्प आपण करूया असे आवाहन मंगल जी यांनी उपस्थितांना केले. हा राजकीय प्रस्ताव मांडत पक्षाचे सरचिटणीस व आमदार अमित साटम म्हणाले की,  गेल्या २४ वर्षांमध्ये २१,००० कोटींपेक्षा जास्त पैसे खर्च करूनही मुंबई शहराचे रस्ते हे देशामध्येच नाही, तर संपूर्ण जगामध्ये खड्ड्यांसाठी कुप्रसिद्ध आहेत.
आपण जेव्हा एखाद्या शहरामध्ये जातो, तेव्हा त्या शहरामध्ये प्रवास करीत असताना तेथील रस्ते कसे आहेत, त्यावरून आपण त्या शहराची प्रतिमा आपल्या मनामध्ये निर्माण करीत असतो. मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून मुंबई शहराचा नाव लौकिक हा आंतरराष्ट्रीय दर्जावर मोठा असतानाही मुंबई शहराला २५ वर्षांमध्ये साधे चांगले रस्तेही मिळाले नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. तसेच दर पावसाळ्यामध्ये मुंबईची तुंबई होणे याची सवयच जणू काही मुंबईकरांना झालेली आहे, असे अमित साटम यांनी सांगितले. गेल्या १० वर्षामध्ये नाला रुंदीकरण व ४ पंपिंग स्टेशनच्या प्रकल्पावर ७ हजार कोटींपेक्षा जास्त पैसे खर्च करूनही मुंबईची तुंबई ही दर पावसामध्ये झालेली दिसून येते. दरवर्षी नालेसफाईमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका १०० कोटी पेक्षा जास्त पैसे खर्च करीत असते. परंतु मुंबईकरांचे ८ हजार कोटींपेक्षा जास्त पैसे हे नाल्यामध्ये बुडून गेल्याचे चित्र हे मुंबई शहरासमोर दिसून येत आहे. असे आमित साटम यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...