Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कल्लोळातही सहीसलामत राहण्यासाठी माध्यम साक्षरता, तारतम्य गरजेचे

Date:

अतुल पेठे यांचे प्रतिपादन; मनोविकास प्रकाशनातर्फे नीलांबरी जोशी लिखित ‘माध्यम कल्लोळ’ ग्रंथाचे प्रकाशन व मुक्तसंवाद
पुणे : “माध्यमे ही जशी जागृतीची साधने आहेत, तशी ती भीतीची दुकानेही आहेत. माध्यमांमधील हा कल्लोळ पूर्वीपासून आहे. त्यामुळे माध्यमांना दोष देण्याऐवजी त्यातले चांगले-वाईट समजून घ्यायला हवे. त्यासाठी तारतम्य बाळगत, मधली ओळ वाचत आपण माध्यम साक्षर व्हायला हवे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्य-दिग्दर्शक अतुल पेठे यांनी केले.
मनोविकास प्रकाशनातर्फे नीलांबरी जोशी लिखित ‘माध्यम कल्लोळ’ ग्रंथाचे प्रकाशन व मुक्त संवादात अतुल पेठे बोलत होते. टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदमजी सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी अभिनेते गिरीश कुलकर्णी, माध्यम अभ्यासक समीरण वाळवेकर, ज्येष्ठ पत्रकार रवि आमले, मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर आदी उपस्थित होते.

अतुल पेठे म्हणाले, “बाह्यजगात आपल्याला उत्पादन आणि ग्राहक म्हणून वापरले जाते. हिंसा आणि लैंगिकता माध्यमाच्या केंद्रस्थानी राहिली आहे. त्यातून अनेकदा मानसिक आरोग्याचे प्रश्न उद्भवतात. अशावेळी आपल्यातील विवेक जागृत ठेवायला हवा. बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपण बदल स्वीकारले पाहिजेत. जीवनशैली बदलली, तरी जीवनमूल्ये बदलता कामा नयेत. तसे झाले तर आपण या कल्लोळातही सहीसलामत राहू शकतो.”
गिरीश कुलकर्णी म्हणाले, “सद्यस्थितीत माध्यमांत माहिती आणि कलकलाट अधिक आहे. आपल्या आकलन, अनुभवाइतकेच आपण बोलावे. ग्राहककेंद्री माध्यमात रोज नवे भोग करून विकले जातात. जगण्याची स्पर्धा, भांडवलाची गरज यामुळे हा कल्लोळ सातत्याने होत राहील, त्यात आपण किती बुडायचे हे प्रत्येकाने ठरवावे. माणूस बनण्याची प्रक्रिया सातत्याने सुरु असते. या कल्लोळापासून जे दूर आहेत, ते आजही खळाळून हसतात. आनंदी जीवन जगतात.”
समीरण वाळवेकर म्हणाले, “माहिती आणि बातमी यात फरक आहे. सध्या ब्रेकिंगच्या जमान्यात खऱ्याचा आभास निर्माण करून ती बातमी पोहोचवली जाते. त्यातून फेक न्यूज प्रतिबिंबित होते. आपण माध्यम साक्षर आहोत हा भ्रम आहे. विकृत प्रयोगातून निर्माण झालेले उत्पादन आपल्यापर्यंत येऊ द्यायचे नसेल, तर आपण माध्यम साक्षर होण्याची गरज आहे.”

रवि आमले म्हणाले, “असत्य, अर्धसत्य हा प्रपोगंडाचा पाया असून, माध्यमे त्याचे वाहक आहेत. परंतु माध्यमांचे व्यवस्थापन चालण्यासाठी जाहिराती गरजेच्या आहेत. अर्थकारण जुळत नसल्याने माध्यमातील अनेक लोक दरिद्री अवस्थेत आहेत. त्यामुळे वाचक, प्रेक्षक म्हणून आपण जागृत राहून त्यातील चांगले ते घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”
अरविंद पाटकर म्हणाले, “वाचनसंस्कृती लोप पावतेय, हा माध्यमातून होणारा अपप्रचार आहे. आपण  वाचकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडतो. ही दुरावस्था थांबवण्यासाठी वाचकांनी जागृतपणे पुस्तके वाचली पाहिजेत. लोकांपर्यंत पुस्तके पोहोचण्यासाठी प्रयत्न व्हावेत. पुस्तकांवरील जीएसटीमध्ये सवलत द्यावी. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी २० जिल्ह्यात ललित साहित्याचे दुकान नाही, याची खंत वाटते.”
माधुरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद पाटकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरकारने विमान प्रवासाचे भाडे केले निश्चित

५०० किमी पर्यंत ७,५०० रुपये /५००-१००० किमीसाठी कमाल भाडे...

मुंबई विमानतळावर तुफान राडा..प्रवाशांचा सयंम सुटला

घराची चावी, पासपोर्ट बॅगेत… आता आम्ही काय करायचे?:बॅगा गहाळ...

चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांना अडवल्याने तणाव:चुनाभट्टी-सायन मार्गावर मोठा गोंधळ, अखेर पोलिसांनी नमते घेत रिक्षा सोडल्या

मुंबई- महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी...

बावधनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना  69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

 पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), विकास प्रतिष्ठान...