बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील 30 पैकी 26 आणि एकूण 200 जागा जिंकून सरकार स्थापन करणार- अमित शहा

Date:

बंगालमध्ये 79.79% आणि असाममध्ये 72.14% मतदान

नवी दिल्ली-पश्चिम बंगाल आणि असाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी पार पडले. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी(दि.28) पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, असाम आणि बंगाल या निवडणुकीपूर्वी राजकीय हिंसाचारासाठी ओळखले जायचे. पण, या दोन्ही ठिकाणी पहिल्या टप्प्यात शांततेत मतदान पार पडले. हे येणाऱ्या काळाचे शूभ संकेत आहेत. यावेळी शहा यांनी दावा केला की, बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील 30 पैकी 26 आणि एकूण 200 जागा जिंकून भाजप बंगालमध्ये सत्ता स्थापन करेल. याशिवाय, असाममध्ये 47 पैकी 37 जागा जिंकण्याचाही दावा त्यांनी यावेळी केला.

अमित शहा म्हणाले की, बंगालमध्ये 200 आणि असाममध्ये आधीपेक्षा जास्त जागा जिंकून सरकार स्थापन करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात असाममध्ये जो विकास झाला आहे, त्यामुळे जनता आमच्या बाजूनेच कौल देणार. डबल इंजिन सरकारची संकल्पना असामच्या जनतेला भाजपच्या आचरणातून समजली.

दीदीने बंगालच्या जनतेला निराश केले

यावेळी अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, बंगालमध्ये तुष्टीकरण, घुसखोरी, भ्रष्टाचार पसरला होता. कोरोना विरोधातील लढाई, अंफानमध्ये हलगर्जीपणा, महिला सुरक्षासारख्या मुद्द्यावरुन जनता ममता बॅनर्जींवर नाराज आहे. 27 वर्षांच्या डाव्यांच्या शासनानंतर जनतेला दीदीकडून खूप आशा होती, पण दीदींनी जनतेला निराश केले.

बंगालमध्ये 79.79% आणि असाममध्ये 72.14% मतदान

पश्चिम बंगाल आणि असामच्या एकूण 77 जागांसाठी शनिवारी मतदान झाले. यात बंगालच्या 30 आणि असामच्या 47 जागा होत्या. इलेक्शन कमीशनने सांगितल्यानुसार बंगालमध्ये 79.79% आणि असाममध्ये 72.14% मतदान झाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...