मुंबई- वाईन विक्रीच्या निर्णयावर आज माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उतारे देताना शरद पवार यांनी केलेले विधान म्हणजे एक प्रकारे त्यांनी राज्य सरकारला सल्लाच दिलाय कि आता तरी सुधरा .. अशी प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आणि यासंदर्भात बोलताना राज्य सरकारवर टीकाही केली आहे. “मला वाटतं की शरद पवारांच्याही हे लक्षात आलं आहे की हा निर्णय चुकला आहे. त्यांच्या लक्षात आलं आहे की समाजाच्या सर्व स्तरातून या निर्णयाला विरोध होत आहे. या निर्णयातून सरकारची अब्रू चालली आहे. जे काही डीलिंग करून या सरकारने काही मूठभर लोकांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला, त्यातून हे सरकार एक्स्पोज झालं आहे. त्यामुळे या सरकारला हा निर्णय मागे घ्यावाच लागेल. हे पवारांच्याही लक्षात आल्यामुळे त्यांनी सरकारला एक प्रकारे सल्लाच दिला आहे की सुधरा”, असं फडणवीस म्हणाले.
शरद पवारांनी एक प्रकारे राज्य सरकारला सल्लाच दिलाय ..आता सुधरा .. म्हणाले फडणवीस
Date:

