बुधवार पेठेतील महिलांना तातडीने मदत द्यावी -सहेली

Date:

पुणे : देहविक्री करणा-या महिलांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दरमहा ५ हजार अशी तीन महिन्यांसाठी एकूण १५ हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. त्यात अनेक महिलांना कागदपत्रे देऊनही निधी बँकेत जमा झाले नसल्याचे समजले, तसेच अनेक महिलांचे संमतीपत्र आणि कागदपत्रे  जमा झाले  नसल्याचेही लक्षात आले. सहेली संघाच्या सर्वेक्षणानुसार बुधवार पेठेतील एकूण ४५८ देहविक्री करणा-या महिला या सरकारकडून मिळणा-या मदतीपासून पूर्ण वंचित राहिल्या आहेत, अशी माहिती सहेली संघाच्या तेजस्वी सेवेकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
याबाबत निवेदने देऊनही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स आणि सहेली संघ संस्थेतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच पुन्हा जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन येत्या आठवडयात त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन पुन्हा केव्हा सुरळीत होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या महिलांसाठी आर्थिक मदत सुरु ठेवावी आणि ज्यांना मदत मिळाली नाही, त्यांच्या पर्यंत पोहोचवावी अशी मागणी देखील यावेळी महिलांतर्फे करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेला सहेली संघाच्या अध्यक्षा महादेवी मदार उपस्थित होत्या.
देहविक्री करणा-या महिलांचा निधी लाटल्याप्रकरणी ४६.६१ लाख रोख रक्कम जप्त करून एका दोषी संस्थेवर पोलिसांनी कारवाई केली व एक महिन्याने गुन्हा दाखल झाला आणि याची चौकशी उपविभागीय दंडाधिकारी यांच्यामार्फत चालू आहे. या सर्व प्रकारात ज्या महिलांसाठी हा निधी आला होता त्या वेश्या वस्तीत राहणा-या महिला आणि त्यांच्या मुलांना मात्र या मदतीपासून पूर्ण वंचित रहावे लागले आहे, त्यांना न्याय कधी मिळणार, हा अजूनही प्रश्न आहे.
तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या, देहविक्री करणा-या २११ महिलांनी संमतीपत्र आणि इतर कागदपत्रे जमा केलेली आहेत. तर २४७ महिलांचे संमतीपत्र किंवा कागदपत्र जमा करुन घेतले नाहीत. याशिवाय महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेली महिलांच्या शाळेत जाणा-या मुलांसाठीची आर्थिक मदतही एकही महिलेला मिळालेली नाही. वस्तीत अशी १०० हून अधिक मुले आहेत, ज्यांच्याकडे आवश्यक कागदपत्र आहेत. याशिवाय धान्य देण्याची ही बातमी आली होती, पण आजतागायत कोणतेही धान्य या महिलांना मिळाले नाही.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अतिशय विपरीत परिस्थितीत जगणा-या वेश्याव्यवसायातील महिलांसाठी २१ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दरमहा पाच हजार अशी तीन महिन्यांसाठी एकूण १५ हजार रुपये अशी आर्थिक मदत जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने त्यावर तात्काळ अंमलबजावणी केली आणि इतर जिल्ह्यांत बरोबर पुणे जिल्ह्यासाठी ११ कोटी २६ लाख ६५ हजार रूपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जिल्हाधिकारी यांच्या खात्यात जमा झाला.
पहिल्या टप्प्यात फेब्रुवारीमध्ये जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग यांच्याकडून  ७०११ वेश्याव्यवसाय करणा-या महिलांपैकी १७६५ महिलांच्या खात्यात प्रत्येकी १५ हजार रुपये असे एकूण २ कोटी ६४ लाख ७५ हजार रुपये वितरित झाले. दुस-या टप्प्यात बाल विकास विभागाने दिलेल्या बातमीनुसार  ३५३१ महिलांना ५ कोटी २९ लाख ६५ हजार दिले गेले, असे एकूण ५ हजार २९६  महिलांना दोन टप्प्यांत ७ कोटी ९५ लाख रुपये इतकी मदत देण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुसळधार पावसाने दुबई ची तुंबई….विमानोड्डाणं रद्द…..प्रवाशी अडकले….

दुबईला गेलेले भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले .... पुणे- गेली...

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...