महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास देशाच्या संपत्तीत वाढ होईल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Date:

पुणे, दि. १९: देशाची अर्धी लोकसंख्या असलेल्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास देशाच्या संपत्तीत भरीव वाढ होईल, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

पुण्यश्री महिला बचत गटाची उत्पादने व किराणा मालाचे दुकान याजनेंतर्गत मावळ तालुक्यातील वडेश्वर येथील संतोषी माता महिला स्वयंसहायता गटाच्या दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, माजी आमदार दिगंबर भेगडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारगावकर, मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत आदी उपस्थित होते.

पालकमंत्री यावेळी म्हणाले, पूर्वी पुरुषांच्या बरोबरीने महिला शिक्षण घ्यायच्या. मात्र इ.स. १२०० नंतर विविध परकीय आक्रमकांमुळे महिलांना कुटुंबात बंद केले गेले. शेती, युद्धात, पुरुषांच्या बरोबरीने काम करणारी महिला घरात अडकून राहिली. स्वातंत्र्यानंतर शिक्षणात महिलांचे प्रमाण वाढले परंतु अर्थार्जनात त्यांचा टक्का अजूनही कमीच आहे. त्यामुळे देशाची संपत्ती वाढण्यात महिलांचे प्रमाण कमी राहिले आहे. आता केंद्र शासन महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात संधी देण्यासाठी धोरणे आणि योजना राबवत असल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली आहे.

श्री. पाटील पुढे म्हणाले, देशाच्या आर्थिक विकासात महिलांचा वाटा असावा असा प्रयत्न असून त्यासाठी महिलांची बुद्धिमत्ता कामी आली पाहिजे. महिलांनी कोणताही व्यवसाय हौस म्हणून नव्हे तर उत्पन्न मिळवणे हा उद्देश ठेवून करावा.
महिलेचा केवळ गृहिणी हा परिचय असू नये तर घरात बसूनही काहीतरी उत्पादन करते आणि त्यातून पैसा कमावते ही स्थिती झाली पाहिजे.

बचत गटाच्या महिला पापड, लोणची अशा पारंपरिक उत्पादनातून सुरुवात करत आता अनेक नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करत असून त्यांना विक्रीची व्यवस्था करून देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतल्याबद्दल श्री. पाटील यांनी जिल्हा परिषदेचे कौतुक केले.

टाकवे ते खांडी रस्ता दुरुस्ती करण्यात येईल असे घोषित करून तात्काळ याचे अंदाजपत्रक करून पुढील प्रक्रिया करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

यावेळी संतोषी माता बचत गटास २ लाख अनुदानाचे पत्र श्री. पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. गटाच्या एका महिलेस २० हजार याप्रमाणे १० महिलांच्या गटास २ लाख रुपये अनुदान आणि ५ लाख रुपये बँक कर्ज असे ७ लाख रुपयांतून बचत गटाने हे दुकान सुरू केले आहे.

मंत्री श्री. पाटील यांनी बचत गटाच्या १ हजार रुपयांच्या उत्पादनांची खरेदी केली. बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करून महिलांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

आयुष प्रसाद म्हणाले, आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध करून देऊन लोकांच्या जीवनात बदल घडवण्याला प्राधान्य देण्याची पुणे जिल्हा परिषदेची भूमिका राहिली आहे. त्याच भूमिकेतून पुण्यश्री योजना राबवण्यात येत असून पुणे जिल्हा परिषदेच्या स्थापनेला ६० वर्षे होत असल्यामुळे या योजनेंतर्गत जिल्ह्यात ६० ठिकाणी दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात २ लाख ५० हजार बचत गट स्थापन झालेले आहेत. बचत गटांना गेल्यावर्षी २०२ कोटी रुपये तर यावर्षी आतापर्यंत १४० कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले आहे.

अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी १६ कोटी अनुदान देण्यात आले असून २१५ अंगणवाड्या बांधून झाल्या आहेत. त्यातील एका अंगणवाडीचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते होत असल्याचे श्री. प्रसाद यांनी सांगितले.

यावेळी पुण्यश्री योजनेच्या बोधचिन्हाचे उद्घाटनही मंत्री पाटील यांच्या हस्ते.

कार्यक्रमास महिला व बालविकास अधिकारी विशाल कोतागडे, वडेश्वर- माऊ ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच छाया हेमाडे, ग्रामपंचायत सदस्य, बचत गटाच्या महिला आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते मोरमारेवाडी अंगणवाडी केंद्राच्या नवीन इमारतीचेही उद्घाटन करण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...