Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आमची सत्ता आली तर पहिल्यांदा औरंगाबादचे संभाजीनगर करू – आ. चंद्रकांतदादा पाटील (व्हिडीओ )

Date:

पुणे-  औरंगाबाद महानगरपालिकेत सत्ता आली तर पहिल्याच दिवशी औरंगाबादचे नामकरण संभाजी नगर असे करू असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे म्हटले आहे. या शिवाय नाल्यांच्या संरक्षक भिंती बांधण्याच्या कामासाठी राज्य सरकारकडून १०० ते १२५ कोटीचा निधी मिळावा म्हणून सरकारला पत्र पाठविण्यास देखील आ. पाटील यांनी प्रशासनास सांगितले आहे.

चंद्रकांत पाटील पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी सभागृहनेते गणेश बिडकर ,नगरसेवक दीपक पोटे, तसेच संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.

ते म्हणाले,’ आज आम्ही शहराच्या विविध विकासाच्या कामांच्या मुद्द्यांवर बैठक घेतली .प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळविण्यासाठी संदीप खर्डेकर यांनी वारंवार प्रशासनाशी बैठका आयोजित केल्या .आता विधानसभा मतदारसंघ निहाय बैठका आता घेणार आहोत .ज्यात प्रशासनाचा सहभाग असेल .२४ बाय ७ योजनेतील ८४ टाक्या  डिसेंबर २१ पर्यंत  पूर्ण होऊन काही साध्य होणार नाही जोपर्यंत पाण्याच्या वितरणाच्या नलिका ,आणि ट्रांसमिशन लाईन्स  पूर्ण होत नाहीत . त्यामुळे असे ठरविले कि 1 विभाग आपण असा पूर्ण करू , ज्याच्या डिसेंबर अखेर पर्यंत टाक्या आणि नलिका सर्व पूर्ण करून व्यवस्था सुरु करू ज्यामुळे शहरात एक चांगला मेसेज जाईल . दरवर्षी पाऊस झाला की नाल्यांचे पाणी शहरात घुसते. त्यासाठी भिंती बांधणे आवश्यक आहे. त्यासाठी ३०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. खासगी सोसायट्यांच्या भिंती पालिकेच्या खर्चातून बांधणे शक्य नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. पालिकेच्या भिंती वगळून सोसायट्यांच्या भिंतींबाबत प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवावा. त्याचा पाठपुरावा केला जाईल. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. मात्र पावसाळ्यापूर्वी महापालिका नाल्यातील गाळ काढून टाकेल. सरकारने तातडीने १०० ते १२५ कोटीचा निधी दिल्यास सर्व सरसकट नाल्याच्या संरक्षक भिंती उभारण्याचे काम हातही घेता येईल .

अपुरे राहिलेल्या  डीपी रस्त्यांचे रुंदीकरण करताना लोकांना ज्यांना टीडीआर नको असतो त्याना कॉम्पेन्सेशन बॉंड देण्यात यावेत या दृष्टीने हे बॉंड लवकरात लवकर आणणार असेही ते म्हणाले.  

पाटील म्हणाले, औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यास शिवसेनेने भूमिका घ्यावी. याविषयात राजकारण करू नये. औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबादची नावे बदलली जाणे हा श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. औरंगजेब हा कोणाचा पूर्वज आहे का? मुंबईत बसविण्यात आलेले आक्रमकांचे पुतळे हटविण्यात आलेले आहेत. तसेच ज्यांनी देशावर राज्य केले, जुलूम केले त्यांची नावे का मिरवायची ? औरंगजेबाचे नाव मिरवायचे ज्यांना इच्छा असेल त्यांनी ते मिरवावे. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर हे नामकरण करावे याबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. .

औरंगाबादचे नामकरण हा श्रद्धेचा विषय आहे, संभाजीनगर हे नाव सगळ्यांना मान्य असून हा राजकारणाचा विषय नाही, असेही ते यावेळी म्हणाले. औरंगाबाद महानगरपालिकेने नामकरणासाठी नवा प्रस्ताव द्यावा लगणार आहे. महापालिका आमच्या हातात द्या पहिल्याच दिवशी नामांतर करून देतो, असे म्हणत एक आश्वासनच चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

रश्मी ठाकरेंना पत्र: “माझ्यासाठी विषय संपला” 

“माझ्या दृष्टीने विषय संपला आहे. मी फक्त वहिनींना तुम्ही सुसंस्कृत महिला संपादक असताना ही भाषा तुमच्या नावाला चिकटतेय. असं म्हणून शेवटी असं म्हटलं होतं की, पण तुम्हाला जर ती भाषा चालणार असेल, तर शुभेच्छा. आता काय चाललंय हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे,” असं पाटील यांनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला:मुंबईसह 29 महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला मतमोजणी

मुंबई:राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. त्यात...

आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वी विरोधकांचा भडिमार:यादी दुरुस्त करा, मगच तारखा जाहीर करा

मुंबई-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आजचा दिवस अत्यंत निर्णायक...

सरकारी भूखंड हडपण्याप्रकरणात पार्थ पवारवर गुन्हा दाखल का होत नाही

पुणे- मुंढवा परिसरातील सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणाने...

आज महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार:दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

सर्वच पक्ष, संभाव्य उमेदवार आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज...तर राज्यात...