कांजूरमार्गाला मेट्रो कारशेड नेले, तर नाकापेक्षा मोती जड होईल – देवेंद्र फडणवीस

Date:

मुंबई-आरेतील 25 टक्के काम पूर्ण झाले आहेत. आता पुन्हा झाडे कापण्याची गरज नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता पुढच्या एका वर्षात हे काम पूर्ण होऊ शकते. कांजूरमार्गाला मेट्रोशेड नेले, तर तिथे बांधकामाला ४ वर्ष लागतील. नाकापेक्षा मोती जड होईल. त्यामुळे मुंबईकरांना मेट्रो लवकर मिळण्याकरीता पर्यायवरणपूरक निर्णय आम्ही घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, सर्वांत महत्त्वाचे म्हणज सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा झाडे कापण्याची परवानगी दिली होती. तेव्हा ही सगळी झाडे मिळून त्यांच्या संपूर्ण लाईफटाईममध्ये जेवढे कार्बन सीक्वेस्ट्रेशन करतील. तेवढे कार्बन सीक्वेस्ट्रेशन ही मेट्रो 80 दिवसांच्या फेऱ्यामध्ये पूर्ण करेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्याला परवानगी दिली होती, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, सगळ्यांना माहिती आहे की ती झाडे कापलेली आहेत. आता नव्याने झाडे कापण्याची गरज नाही. काही पर्यायवरण वाद्यांना हे माहिती नसल्याने ते आंदोलन करत नसतील. तर काही पर्यायवरणवादी हे पृरस्कृत आहेत. तथापी सर्व पर्यायवरण प्रेमींचा आदर राखून आवश्यक ती चर्चा आम्ही करू. मात्र, मेट्रो हा मुंबईचा अधिकार आहे. मेट्रो नसल्यामुळे मुंबई प्रदुषणामुळे दररोज होरपळत आहे. पण, हे पाप आम्ही जास्त दिवस चालू देणार नाही. तसेच ठाकरे सरकारचे सरसकट निर्णय रद्द करणार नाही. पण, मागच्या सरकारने सूड हेतूने घेतलेले निर्णय अभ्यास करुन रद्द केले जातील, असे त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...

राष्ट्रीय कला उत्सवाला जल्लोषात सुरुवात

पुणे दि. २०: भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी प्रस्तावित जागा खासगी विकासकाकडून परत घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे महानगरपालिकेने विकासकास बांधकाम परवानगी नाकारणे हे स्मारकाच्या दृष्टिकोनातून...