पावसाने झोडपल्यावर जागे झाले आयएएस अधिकारी ..कनिष्ठांना म्हणाले अहवाल द्या…

Date:

पुणे – महापालिकेत राज्य सरकारने आयुक्तांपासून काही पदांवर आय ए एस अधिकारी नियुक्त केले आहेत. महापालिकेतील कंत्राटी कामगारांवरील आर्थिक अत्याचार असू द्यात,पुणेकरांच्या आरोग्याची समस्या असू द्यात हे अधिकारी करतात काय ? मुलाखती देऊन मिरवितात,समस्या आल्या कि कनिष्ठांना अहवाल द्या म्हणून आदेश सोडून मोकळे होतात असाच काहीसा अनुभव आता पुण्याची तुंबई झाल्यावर देखील येतो आहे.थोडक्यात काय मराठीतच सांगायचे झाले तर.हवा गेली सरून..आणि आता..धरला आवळून..अशी काही तरी म्हण आहे,घटना घडण्या पूर्वी या अधिकाऱ्यांनी काय नुसत्या खुर्च्या गरम करून ताव मारले कि काय ? असा प्रश्न कोणीही उपस्थित करेल अशी स्थिती आहे. काही झाले तरी मूळ इथले अधिकारी बळी द्यायचे आणि यांनी येऊन मस्त भेळ खाऊन दौरे मारून उंटावरून निघून जायचे अशीच स्थिती महापालिकेत वारंवार दिसून आली आहे.

पुण्याची तुंबई झाल्यावर एका आय ए एस अधिकाऱ्याने महापालिकेने नालेसफाई निकृष्ट पद्धतीने केल्याने शहरात पाणी तुंबले,पण त्याचसोबत बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने बांधकाम व्यावसायिकांनी त्यांना हवे तसे नाले वळविले मत नोंदवून जबाबदारी झटकून टाकली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने शहरातील नाल्यांची स्थिती, अतिक्रमण झालेले नाले, बेकायदा बांधकाम झालेले नाले याचा अहवाल सोमवारी सादर करावा असे आदेश त्यांनी दिल्याचे वृत्त आहे.शहर आणि परिसरात रविवारी मुसळधार पाऊस झाला. शहराच्या सर्वच भागात मोठ्याप्रमाणात पाणी तुंबले. त्याचसोबत पाणी वाहून जाण्यासाठी जागा नसल्याने.रस्त्यावरून पाणी वेगात वाहू लागले. काही ठिकाणी सोसायटीच्या सीमाभिंती पडल्या, पण सुदैवाने त्यात कोणालाही दुखापत झाली नाही.वारंवार पुराचे दर वर्षी इशारे देणाऱ्या लोकप्रतिनिधींना,माध्यमांना आम्ही दक्षता घेतो आहे असे पावसाळ्यापूर्वी सांगणारे हे अधिकारी पूर आल्यावर नंतर पाहणी करतात आणि काही ठिकाणी पाणी साचण्याचे ठिकाण, तेथे वाहून जाण्यासाठीची व्यवस्था काय आहे याचा आढावा घेतात,आणि कनिष्ठांना अहवाल द्यायचे आदेश देऊन मोकळे होतात,सारेच अजब आहे.त्यानंतर तेथे त्वरित आवश्‍यक असलेली कामे करणे आणि दीर्घकालीन कामे केली जाणार आहेत. नाल्यांमधील अतिक्रमण, नाले वळविणे, रुंदी कमी करणे असे प्रकारही निदर्शनास आल्याचे सांगून अनेक नागरिकांकडून याबाबत तक्रारी आलेल्या आहेत असे वक्तव्य करतात म्हणजे आता किती बनवा बनवी करायची याला काही मर्यादाच राहिलेली नाही. पाऊस १ /२ तास जोरदार झाला रात्रभर झाला असता तर..अशा आय ए एस अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करून त्यांच्या जागेवर कार्यक्षम अधिकारी नियुक्त करावेत अशी मागणी आता होऊ लागली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करा-खासदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेत मागणी

शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेकडे वेधले लक्ष वर्षाकाठी १० हजार कोटींचे आर्थिक...