Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

खाेक्यांच्या नावाने टीका करणाऱ्यांचे खाेक्यांचा वापर काेणी केला याबाबतचे माझ्याकडे दहा विषय,आगामी काळात ते पुढे येतीलच -मंत्री चंद्रकांत पाटील

Date:

पुणे- खाेक्याचा विषय आम्हा सर्वसामान्यांच्या दृष्टीने आंब्यासाठी, एखाद्या वस्तूसाठीचे खाेके इतकाच हाेताे. परंतु खाेक्याचा विराेधकांना माहिती असणारा अर्थ त्यांनी घेतल्याने वर्षानुवर्ष राज्याची वाट लागलेली आहे, अ​​​​​सा टोला भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात लगावला.चंद्रकांत पाटील म्हणाले, खाेके काेणी काेणाला दिले, खाेक्याचा वापर काेणी केला याबाबत टीका करणाऱ्यांचे माझ्याकडे दहा विषय असून ते आगामी काळत आम्ही उपस्थित करू. एखादे टेंडर का निघाले, ते काेणाला दिले गेले, कशाप्रकारे नियम डावलले गेले याबाबत वेगवेगळया खात्यांकडे ढीगभर विषय आहे.असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात सुरू असलेल्या खोक्याच्या राजकारणावत जोरदार टीका केली होती. त्याचा चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला.

काय म्हणाले होते जयंत पाटील?

खाेक्याचे विषय असतील तर ते बंद खाेलीत चर्चा हाेऊन मिटू शकतात, त्यासाठी बाहेर चर्चा करण्याची गरज नाही, असा टाेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला रवी राणा-बच्चू कडू यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर लगावला हाेता.

निवडणुका होणार तरी कधी ?

नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुक कधी हाेणार याबाबत पाटील म्हणाले, संबंधित विषय हा न्यायालयीन प्रक्रियेत आहे. सर्वाच्च न्यायालयाने सदरचा विषय हा उच्च न्यायालयाकडे सुपुर्द केला असून न्यायालयीन प्रक्रियेत विषय असताना त्यावर भाष्य करणे याेग्य नाही. गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर येईल अशी चर्चा रंगू लागली याबाबत ते म्हणाले, गुजरातची निवडणुक जवळ आल्यावर ज्यांचे डिपाॅझिट मागील निवडणुकीत जप्त झाले ते अशाप्रकारे भाष्य करतात.

लाेकशाहीत त्यांना वेगवेगळे दावे करण्याचा अधिकार आहे, परंतु सन 1985 पासून गुजरात मध्ये भाजप शिवाय दुसरा काेणताही पक्ष सत्तेत आलेला नाही. महाराष्ट्रातील भाजप-सेना आणि सहयाेगी पक्षाचे अपक्ष सदस्य यांच्यात काेणते मतभेद असतील तर त्याबाबतची साेडवणुक करण्यास एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस समर्थ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सामन्यात सरकारी जाहिरात

स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार जणांना राेजगार देण्याचा संकल्प केंद्र व राज्य सरकारने केला असून त्याबाबतची जाहिरात वेगवेगळ्या वृत्तपत्रांना देण्यात आली आहे. मात्र, संबंधित जाहिरात शिवसेनेचे मुखपत्रात छापली गेल्याने वाद-प्रतिवाद सुरु झाले. याबाबत पाटील म्हणाले, शिवसेनेचे मुखपत्र हे व्यवसायिक वृत्तपत्र असून या जाहीरातीवर टिका करणे याेग्य नाही. शासनाचे निर्णय सर्वसामान्यां पर्यंत पाेंहचविण्याकरिता विविध वृत्तपत्रांना जाहीरात दिली जाते, त्यानुसार ती सामनाला ही दिली गेली आहे.

राहुल गांधीच्या प्रयाेगांना यश नाही

काँग्रेसच्या भारत जाेडाे यात्रे अंर्तगत राहुल गांधी महाराष्ट्राच्या दाैऱ्यावर येतात याबाबत पाटील म्हणाले, सदर यात्रा ही काँग्रेसची असल्याने तिचे आम्ही स्वागत करण्याचे कारण नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार असून ते वेगवेगळे माध्यम वापरतात. राहुल गांधी यांनी आतापर्यंत अशाप्रकारे अनेक प्रयाेग करुन पाहिले परंतु त्यांना यश मिळाले नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय तर 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने...