‘मै नरेंद्र दामोदरदास मोदी…’ सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान पदी मोदी शपथबद्ध(व्हिडिओ)

Date:

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यानंतर अन्य मंत्र्यांच्या शपथविधीला सुरुवात झाली. यात सर्वप्रथम राजनाथ सिंह आणि त्यानंतर अमित शहा यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकार 2.0 म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या कॅबिनेटमध्ये केंद्रातील प्रमुख नेते राहिलेल्या सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा समावेश नाही. या दोन्ही नेत्यांनी मंत्रिपद नको असल्याचे यापूर्वीच पत्र लिहून कळवले आहे. जेटली उपचारासाठी परदेशात असून सुषमा स्वराज यांनी शपथविधी समारंभाला उपस्थिती लावली. परंतु, त्यांनी व्यासपीठावर बसणे टाळले. मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात राजकारण, उद्योग, बॉलिवूड आणि विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींसह परदेशातील नेत्यांनीही उपस्थिती लावली .नितीन गडकरी यांनी  कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली .रामदास आठवले यांनी हि मंत्रीपदाची शपथ घेतली आहे .गोव्याचे श्रीपाद नाईक यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. या सोहळ्याला दिग्गजांची हजेरी आहे. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सात वाजल्यापासून हा सोहळा रंगला आहे. या सोहळ्यासाठी थोड्या थोडक्या नाही तब्बल सहा हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं. यामध्ये बॉलिवूडच्या तारे-तारकांचाही समावेश आहे. सुपरस्टार रजनीकांत, अभिनेते कमल हासन यांच्यासह कंगना रणौत, शाहरूख खान, करण जौहर, संजय लीला भन्साळी यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

शपथविधीसाठी बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान यांचा समावेश असलेल्या ‘बिमस्टेक’ देशांचे प्रमुख उपस्थित आहेत. २०१४ च्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रण होते. मात्र या वेळी पाकिस्तानला वगळण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग शपथविधासाठी उपस्थित राहिले आहेत.

-रेणुका सिंह सरूता यांनी घेतली गोपतीयतेची शपथ सोमप्रकाश मंत्रीमंडळात सामील

– रतनलाल कटारिया आणि व्ही. मुर्लीधरन यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

– सुरेश अंगडी आणि नित्यानंद राय मंत्रीमंडळात सामील

– संजीव कुमार बालियान, संजय धोत्रे आणि अनुराग सिंह ठाकुर यांनी घेतली गोपनीयतेची शपथ

– निरंजण ज्योती आणि बाबुल सुप्रियो यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

– गंगापुरम किशन रेड्डी, पुरूषोत्तम रुपाला यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

– प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी घेतली मंत्रीपदाची शपथ

– कृष्णपाल गुर्जर यांनी घेतली शपथ

– अर्जुन राम मेघवाल आणि व्ही. के. सिंह मंत्रीमंडळात सामील

– मुनसुख मांडवीय, फग्गनसिंह कुलस्ते आणि अश्विनी कुमार चौबे यांनी घेतली शपथ

– किरण रिजीजू, प्रल्हाद सिंह पटेल, राजकुमार सिंह, हरिदीप सिंग पुरी मंत्रीमंडळात सामील

– राव इंद्रजीत सिंह,आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी घेतली गोपनीयतेची शपथ

– संतोष कुमार गंगवाल यांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ

– गिरीराज सिंह, गजेंद्र सिंह शेखावत

– डॉ. महेंद्रनाथ पांडे आणि डॉ. अरविंद सांवतांनी घेतली शपथ

-मुख्तार अब्बास नख्वी आणि प्रल्हाद जोशी शपथ घेऊन मंत्रीमंडळात सामील

– पीयूष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली गोपनीयतेची शपथ

– डॉ. हर्षवर्धन आणि प्रकाश जावडेकर शपथ घेऊन मोदींच्या मंत्रीमंडळात सामील

– स्मृती इराणी यांनी घेतली गोपनीयतेची शपथ

– झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा आता मोदी सरकारमध्ये मंत्री

– थावरचंद गहलोत, सुब्रह्मण्यम जयशंकर, डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांना मंत्रिपदाची शपथ

– हरसिमरत कौर बादल यांचा मोदी कॅबिनेटमध्ये समावेश, मंत्रिपदाची शपथ

-रवीशंकर प्रसाद यांनाही पुन्हा केंद्रीय मंत्रिपदाची संधी

– नरेंद्र सिंह तोमर यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ

– रामविलास पासवान यांचा मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये समावेश

– एनडीए-1 मध्ये संरक्षण मंत्री राहिलेल्या निर्मला सीतारमण यांनाही मंत्रिपद, इंग्रजीतून घेतली शपथ

– शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये जदयू नेत्यांचा समावेश नाही

– डीव्ही सदानंद गौडा यांनी इंग्रजीत घेतली मंत्रिपदाची शपथ

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.