घर घर तिरंगा पण ज्यांना घर नाही त्यांचे काय ?

Date:

हुकुमशाही आणि गुलामगिरीकडे देश नेला जात असताना अमृतमहोत्सव कसला ?

मुंबई : आज मुंबईत मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाचा ६२ वा वर्धापन दिन आज मुंबईत पार पडला आहे. या साप्ताहिकाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे असून मुंबईत शिवसेना नसती तर देशात हिंदुत्वाचं काय झालं असतं असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमावर सरकारला धारेवर धरलं आहे.मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमावेळी बोलताना उद्ध ठाकरे बोलताना म्हणाले की, “शिवसेना आणि मार्मिककडे कायम तरूणाईचं आकर्षण राहिलं आहे. मार्मिकने लोकांच्या समस्यांना वाचा फोडली आहे. वयानं थकलं तरी चालेल पण विचाराने थकलं नाही पाहिजे. आपण दीडशे वर्ष गुलामगिरीत काढली आणि त्यानंतर आपल्याला अनेक संघर्ष करून स्वातंत्र्य मिळालं. आपण आता स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय, पण फक्त तिरंगा फडकावून देशभक्त होता येत नाही.” असा टोला त्यांनी लावला आहे.सध्या केंद्रात ज्या पक्षाचं सरकार आहे त्यांचा प्रादेशिक पक्ष संपवण्याचा डाव आहे. त्यांनी आता लोकशाहीला मृतावस्थेत नेत हुकुमशाही चालवली आहे पण शिवसेना संपणारा पक्ष नाही आहे. तुम्ही स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहात पण यावेळी तुम्ही लोकशाहीला मृतावस्थेत नेत असाल तर हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कसला? असा सवाल त्यांनी केला आहे. त्याचबरोबर अनेकांना घरावर तिरंगा लावयाचा आहे पण त्यांच्याकडे घर नाही अशी अवस्था झाली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.व्यंगचित्रकारांच्या ताकदीबद्दल बोलताना “जर देश हुकुमशाहीकडे चालला असेल तर प्रत्येक व्यंगचित्रकाराने सरकारवर फटकारे मारलेच पाहिजेत.” असा संदेश उद्धव ठाकरे यांनी व्यगचित्रकारांना दिला आहे.

उद्धव म्हणाले की, काही जणांना वाटतं की, शिवसेना म्हणजे उंबऱ्यावर पडलेली वस्तू आहे. शिवसेनेची पाळमुळं ६२ वर्षांची आहे. मार्मिकचा जन्म झाला ते वर्ष १९६० आहे. मार्मिकने व्यंगचित्रकार काय करू शकतो, हे दाखवून दिलं. महाराष्ट्राने मुंबई मिळवली. मात्र मराठी लोकांवर अन्याय होतच होते. मार्मिकने व्यंगचित्रातून त्या अन्यायाला वाचा फोडली. शिवसेनाप्रमुखांनी व्यंगचित्र काढली. शिवाय शिवसेनाही काढल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरे पुढं म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की देशातील सर्व पक्ष संपून जात आहे. हे वक्तव्य लोकशाहीला घातक आहे. सत्ता येती आणि जाते. मात्र नड्डा म्हणाले देशात एकच पक्ष राहणार आहे. त्यांनी ज्याला प्रदेशाध्यक्ष केलं त्यांची किती कुळं आहेत मला माहित नाही. पण शिवसेना संपुष्टात येऊ शकत नाही. मग त्यांची ५२ असो वा १५२ कुळे असो आपल्याला फरक पडत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवसेनेत गोंधळात गोंधळ, विजय शिवतारेंनी गोंधळ केल्याची तक्रार

रात्री १२ वाजता पत्रकार परिषद ..नंतर तीही रद्द .....

अजित पवारांचे गुंडगिरीला पाठबळ?गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी

पुणे -महापालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी...

रूपाली पाटील-ठोंबरेंना उमेदवारी;प्रभाग २६ मधून घड्याळ चालविणार

पुणे- आक्रमक महिला नेत्या अशी ओळख असलेल्या पुणे महापालिका...

राष्ट्रवादी बरोबरच जायचे होते तर महाविकास आघाडीचे सोपस्कार केलेच कशाला?

शिवसेना जिल्हा संपर्क नेते सचिन अहिर यांचा सवाल पिंपरी, पुणे...