सकाळी 11 ते दुपारी 2 दरम्यान 10-15 मिनिटे उन्हात बसा, कोरोना टाळा; केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांचे विधान

Date:

नवी दिल्ली – देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. यापासून बचावासाठी सरकार आवश्यक अशी सर्व पावले उचलत आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी कोरोनाबाबत वादग्रस्त  वक्तव्य केले आहे. सूर्याची किरणे सर्व व्हायरस नष्ट करतात असा दावा चौबे यांनी केला आहे. गुरुवारी संसद परिसरात कोरोनावरील उपयायोजनांबाबत त्यांना विचारणा केल्यानंतर ते म्हणाले की, “सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ऊन जास्त असते. प्रत्येक जण 10-15 मिनिटे उन्हात बसले तर त्याचा लाभ होईल. सूर्यप्रकाशातून व्हिटामिन डी मिळते आणि इम्युनिटी सुद्धा वाढते. सोबतच सर्वप्रकारचे व्हायरस नष्ट होतात. यामुळे सर्वांनी उन्हात बसले पाहिजे.”

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 177 झाली आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशमध्ये 3 आणि चंदीगड, कर्नाटकात प्रत्येकी एका प्रकरणाची पुष्टी झाली. ब्रिटनहून चंडीगडला आलेल्या 23 वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. अशात सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व पावले उचलत आहे.

चौबे यापूर्वीही आपल्या विधानांमुळे राहिले चर्चेत

अश्विनी चौबे याआधीही आपल्या विधानांमुळे चर्चेत राहिले आहेत. डिसेंबर 2019 मध्ये कांद्याचा भाव 100 ते 120 रुपयांपर्यंत पोहोचला होता. याबाबत चौबेंना विचारले असता ते म्हणाले होते की, “मी शाकाहारी आहे. मी कधीच कांदा खाल्लेला नाही. मी कांदाच खाल्ला नसल्यामुळे मला कांद्याचे भाव कसे माहित असतील?”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...