पुणे -शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे पुण्याच्या माजी महापौर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस कमल व्यवहारे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शहराध्यक्ष रमेश बागवे होते.

यावेळी बोलताना माजी महापौर कमल व्यवहारे म्हणाल्या की, ‘‘१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर राज्यघटना तयार करण्यासाठी त्यावेळचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी मसुदा स्थापन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्याचे अध्यक्ष केले. २६ जानेवारी १९५० ला संविधान अंमलात आणले. या संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला. अल्पसंख्यांकाना त्यांच्या स्वत:च्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचे अधिकार मिळाले. या संविधानानुसार देशाचा कारभार चालतो. संविधानाने सर्व जाती धर्मांना समानतेचा अधिकार दिलेला या संविधानाचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे.’’

यावेळी माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, दिप्ती चवधरी, वीरेंद्र किराड, नगरसेवक अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, अजित दरेकर, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, मुख्तार शेख, अमीर शेख, अनिल सोंडकर, संगीता तिवारी, पूजा आनंद, विशाल मलके, भुषण रानभरे, भिमराव पाटोळे, शिवाजी बांगर, बाळासाहेब मारणे, ॲड. शाबीर खान, द. स. पोळेकर, राजेंद्र भुतडा, सचिन आडेकर, प्रविण करपे, शिलार रतनगिरी, अनुसया गायकवाड, अंजली सोलापूरे, नरेश नलावडे, वाल्मिक जगताप, भरत सुराणा, संदिप आटपाळकर, ॲड. नितीन परतानी, चैतन्य पुरंदरे, साहिल राऊत, ॲड. निलेश बोराटे, संदिप आटपळकर, सौरभ अमराळे, उस्मान तांबोळी, परवेज तांबोळी, मयूर भोकरे, प्रशांत सुरसे, सुरेश कांबळे आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

झेंडावंदन नंतर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस भवन येथून अभिवादन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष व प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूंना भेट देवून थोर स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आले. काँग्रेस भवन – शनिवार वाडा – हुतात्मा कर्णिक स्मारक (मजूरअड्डा) – महात्मा फुले मंडई – केशवराव जेधे यांचे घर, शुक्रवार पेठ – सुभाषचंद्र चौक, तांबोळी मशीद – अरुणा असफ अली चौक, नाना पेठ तर शेवट हिन्दू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या साखळीपीर तालीम, नाना पेठ येथे सभेने या अभिवादन फेरीची सांगता झाली.
सांगता सभेच्या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘‘देशभक्ती म्हणजे फक्त स्वातंत्र्य चळवळीत जे इग्रजांविरुध्द्व लढले असा आपण समजतो पण इतिहासात अशी विविध उदाहरण आहेत ज्यात प्रत्यक्ष इंग्रजांविरुध्द न लढता सर्व सामान्य लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. नाना पेठेतील किराणा माल दुकानदारांनी स्वातंत्र्य लढ्यात ज्यांना तुरुंगवास होत होता त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना मोफत राशन दिले होते. राष्ट्रीयत्व व भारतीयत्व याचा संबंध नसणारे आज सत्तेवर आहेत व ते आज देशभक्ती शिकवत आहेत ही आजच्या काळाची शोकांतिका आहे असे परखड मत मांडले.’’
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने संविधानाचा जागर मांडत पुण्यातील ज्या ऐतिहासिक ठिकाणांना वारसा लाभला आहे तिथे त्या वास्तू व क्रांतिकारकांच्या कार्याची कर्तृत्वाची माहिती असणाऱ्या फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच भाई चोरगे, मेहरबान पठाडे, रवी शिंदे, अन्सारी बाबा सयद, सदाशिव शिर्के, शिवाजी शिर्के, चंदू नेपाळी, ज्ञानोबा झेंडे, सीताराम घल, भाई बेलीकर, सीताराम जाधव, श्री हरी भाऊ धनावडे, भाई टिळेकर, अंबूबाई टिळेकर या स्वातंत्र्यसैनिकांच्या घराला तोरण बांधण्यात आले.
अभिवादन फेरी दरम्यान मेरे देश की धरती, मेरा रंग दे बसंती चोला ही गाणी काफिला या लोकायतच्या सांस्कृतिक आघाडीने घेतली. तसेच जाती पाती सोडा देशाला वाचवा, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सगळयांना सांगणार अशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, अभय छाजेड, राष्ट्रवादी पक्षाचे गणेश नलावडे, शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे, लोकायतचे निश्चय साधना उपस्थित होते. अभिवादन फेरीचे सूत्रसंचालन स्वप्नील फुसे यांनी केले तर प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांनी केले.

