पुणे-नातीला भेटण्यास प्रतिबंध केल्याने आजोबांनी आत्महत्या केल्याप्रकरणी न्यायाधीश मुलाने विभक्त पत्नी विराेधात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती बुधवारी दिली आहे.या घटनेनंतर तब्बल चार वर्षांनी याबाबत तक्रार नोंदविण्यात आली आहे . ही घटना 3/11/2018 ते 23/12/2018 यादरम्यान घडलेली आहे.
न्यायाधीश असलेल्या मुलाचे लग्नानंतर पत्नीशी काही वर्ष संसार केल्यावर पटले नाही आणि ते विभक्त झाले. परंतु विभक्त झालेल्या पत्नीसह नातही गेल्याने आजाेबा व्यथित होते. त्यानंतर ते नातीला भेटण्यासाठी विभक्त सुनेच्या घरी जात हाेते. परंतु त्यांना नातीस भेटण्यास विभक्त सुनेने मनाई करत धक्काबुक्की करत घराबाहेर काढल्याने त्यांनी घराच्या चाैथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती.
नामदेव सराेदिया असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा संदीप नामदेव सराेदिया (वय-53,रा. बाणेर,पुणे) यांनी चतुश्रृंगी पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, त्यांची विभक्त पत्नी शालीनी ऊर्फ शिवानी, सासु मनीलता शर्मा व मेव्हणा शेखर शर्मा ( तिघे रा.बाणेर,पुणे) यांचे विराेधात पाेलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 3/11/2018 ते 23/12/2018 यादरम्यान घडलेली आहे.
न्यायधीश असलेले संदिप सराेदीया व शालिनी यांच्यात काैटुंबिक कारणावरुन वाद हाेऊन घटस्फाेट झाला आहे. न्यायाधीशाांचे वडील हे नातीला भेटण्यासाठी विभक्त झालेल्या सुनेच्या घरी गेले हाेते. त्यावेळी त्यांना मुलाच्या सासरच्या व्यक्तींनी धक्काबुक्की करुन नातीला भेटू न देताच घराबाहेर हाकलून दिले हाेते. तसेच ते आजारी असताना देखील त्यांनी नातीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. परंतु त्यांना भेटू दिले नाही. त्यामुळे या गाेष्टीचा आजाेबांच्या मनावर आघात हाेऊन त्यांनी व्यथित होत कंटाळुन राहत्या घराच्या चाैथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी सुसाईड नाेट लिहूून ठेवली होती.
पाेलिसांना चिठ्ठीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तसेच तक्रारदार न्यायाधीश यांच्या आईवर कॅन्सरचे उपचार सुरु असल्याने उशिराने गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. याबाबत चतुश्रृंगी पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक एस. गायकवाड तपास करीत आहेत.

