राज्यपाल कोश्यारींची राष्ट्रपतींनी हकालपट्टी करावी:कोश्यारींना स्वइच्छेनुसार राज्यातून जाऊ देऊ नये – नाना पटोले

Date:

पुणे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सतत वादग्रस्त विधान करत राहिल्याने त्यांची पदावरून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करत आलो आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना स्वेच्छेने मुक्त न होऊ देता, राष्ट्रपतींनी त्यांची हकालपट्टी करावी, अशी आमची मागणी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा फुले वाडा येथे आयोजित ‘हाथसे हाथ जोडो ‘अभियानाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शहर अध्यक्ष अरविंद शिंदे ,माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार दीप्ती चौधरी, अभय छाजेड,संगीता तिवारी उपस्थित होते.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रधानमंत्री यांना लेखी पत्र पाठवत जबाबदारीमधून मुक्त करण्यात यावे असे सूचित केले. मात्र, राज्यपाल यांनी राज्यात सविधाननुसार काम करणे महत्वाचे होते मात्र तसे ते वागले नाही. त्यांच्या काळात राज्यपाल भवन हे भाजप भवन झाले होते. संविधान व्यवस्थेला छेद देण्याचा काम त्यांनी केले. राज्यपाल यांना एका पक्षाची बाजू घेऊन काम करणे चुकीचे होते.

राज्यपाल यांच्या मनात बहुजन समाज बाबतचा राग वेळोवेळी त्यांच्या वक्तव्यामधून दिसून आला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केले. भाजप कार्यकर्ता राज्यपाल होऊन ते वारंवार राज्यातील महापुरुष यांचा अपमान करत होते. त्यामुळे राष्ट्रपती यांना आमची विनंती आहे की, त्यांनी कोश्यारी यांची हकालपट्टी करावी, त्यांना स्वइच्छेनुसार राज्यातून जाऊ देऊ नये. यापुढे संविधान रक्षण करणारे राज्यपाल, राष्ट्रपती यांनी महाराष्ट्रामध्ये पाठवावे, असे मत पटोले यांनी व्यक्त केले.

पटोले म्हणाले, आजपासून महाराष्ट्र मध्ये पक्षाचे हे अभियान सुरू करत आहे.देशाच्या संविधान व्यवस्थेला आव्हान देण्याचे काम सध्या करण्यात येत आहे. सुशिक्षित लोकांना बेरोजगार करण्याचे काम केले जात आहे.लोकशाहीत जनता देशात राजा असून त्यांना आव्हान देण्याचे काम सत्ताधारी करत आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा माध्यमातून लाखो लोकांना देशभरात जोडले आहे. महात्मा फुले यांनी समतेचा विचार दिलेला आहे.त्याकाळी बहुजन यांना संपविण्याचा काम करण्यात येत होते आणि शेतकऱ्यांवर अत्याचार केला जात होता त्याचा सामना त्यांनी केला.

आंबेडकर यांचा युती बाबत नेमका प्रस्ताव नाही

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या युतीला आमच्या शुभेच्या आहे. त्यांचा युती बाबत कोणता प्रस्ताव आमच्याकडे अद्याप आलेला नाही. ठाकरे यांच्याशी माझे आज बोलणे झालेले आहे. त्यांची पत्रकार परिषद ही महविकास आघाडीची नव्हती तर सदर दोन पक्षाची होती. युती बाबत नेमका प्रस्ताव अद्याप आंबेडकर यांनी आम्हाला दिलेला नाही असे मत पटोले यांनी व्यक्त केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...