Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

गायत्री परिवारतर्फे युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या पुस्तकांच्या प्रदर्शनाचे ७ ते २२ जानेवारी दरम्यान आयोजन

Date:

पुणे : अखिल विश्व गायत्री परिवारतर्फे विचारक्रांती अभियानांतर्गत सेवा शांतिकुंज हरिद्वारचे युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य (१९११ ते १९९०) यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. ७ ते २२ जानेवारी २०२३ या कालावधीत बाजीराव रस्त्यावरील आचार्य अत्रे सभागृहात सकाळी ९ ते रात्री ९.३० या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे, अशी माहिती गायत्री परिवारचे राजेश टेकरीवाल, हेमंत जोगळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी हरिद्वार येथील प्रा. विश्वप्रकाश त्रिपाठी, गायत्री परिवाराच्या प्रतिभा मुळे, विनोद पटेल, पद्माकर लांजेवार आदी उपस्थित होते.
राजेश टेकरीवाल म्हणाले, “आचार्यांनी गायत्री मंत्राच्या साधनेद्वारे माणसाचे परिवर्तन घडवून यावे, त्याची प्रतिभा जागृत व्हावी, चांगले विचार व चांगल्या कर्माकडे माणसाचा प्रवास होत रहावा, त्यातून कुटुंब, समाज व राष्ट्र देखील सकारात्मक ऊर्जेने भरून जावे व विश्वातील सर्व घटकांनी भेदाभेद विसरून, एकत्र येऊन आपले कल्याण करून घ्यावे, या उद्देशाने जन्मभरात सुमारे ३२०० पुस्तकांचे लेखन केले.जीवनातील प्रत्येक समस्येवर उपाय सांगणारी ही पुस्तके आहेत. आत्मबल, मनोबल वाढवून तणावातून मार्ग कसा काढावा, याविषयी ही पुस्तके मार्गदर्शनपर आहेत. सामाजिक काम करणार्‍यांनाही ती उपयुक्त आहेत. हा सर्व द्न्यानाचा खजिना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विचारक्रांती अभियानाच्या माध्यमातून या पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. अतिशय सवलतीच्या दरात ही पुस्तके वाचकांना उपलब्ध होणार आहेत.”
हेमंत जोगळेकर म्हणाले, “आचार्यजींनी आपल्या लेखनातून मानवी समाजापुढे ‘मानवात देवत्वाचा उदय व पृथ्वीवर स्वर्गाचे अवतरण’ हेच ध्येय ठेवले आहे. देह ठेवण्याआधी सुमारे पाच वर्षे त्यांनी क्रांतिधर्मी साहित्य या नावाने विशेष पुस्तके लिहिली. त्याद्वारे येणाऱ्या नवीन युगासाठी त्यांनी मानवतेला उज्ज्वल भविष्याचा मार्ग  दाखवला आहे. युगऋषी पंडित श्रीराम शर्मा यांच्या पुस्तक प्रदर्शनाचे हे पाचवे वर्ष आहे. युगऋषी यांनी आपल्या ८० वर्षांच्या तपस्वी जीवनात ३२०० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. याबरोबरच चार वेद, १०८ उपनिषदे, श्रुती व इतर ग्रंथांवर अभ्यास करुन सर्वसामान्यांना समजेल, अशा स्वरुपात त्याची मांडणी केली आहे.”
हे प्रदर्शन विद्यार्थी, समाजसेवक, अध्यात्म मार्गावरील साधक, देश प्रेमी, संस्कृती प्रेमी अशा सर्व लोकांसाठी नवीन प्रेरणा देऊन, योग्य मार्गदर्शन करणारे ठरेल असा आम्हाला विश्वास वाटतो. गायत्री महाविज्ञान हा हिंदीतील तीन खंडात असलेला- गायत्री मंत्र व साधना विषयीचा विश्वकोश समजला जाणारा- ग्रंथ मराठी भाषेत एकत्रित स्वरूपात या प्रदर्शनात उपलब्ध केला जाणार आहे. भारतीय संस्कृतीची बीजे तरुण पिढीमध्ये उतरावीत, यासाठी परिवाराच्या वतीने शाळा, महाविद्यालयांतून भारतीय संस्कृती ज्ञान परिक्षा आयोजित करण्यात येते. राजस्थान व छत्तीसगड या राज्यांनी तर ही परिक्षा शाळांमधून अनिवार्य केली आहे, असेही यावेळी नमूद करण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय तर 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने...