Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘एमसीए’ची निवडणूक प्रक्रियाच बोगस-माजी रणजीपटू अनिल वाल्हेकर यांचा आरोप

Date:

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) निवडणूक आठ जानेवारीला होणार आहे. मात्र, ही निवडणूक प्रक्रियाच सुप्रीम कोर्टाच्या शिफारशींनुसार नाही आणि घटनेनुसारही नाही. ही पूर्ण प्रक्रियाच बोगस असल्याचा आरोप माजी रणजी क्रिकेटपटू अनिल वाल्हेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. 
पत्रकार परिषदेला माधव रानडे, ॲड. कमल सावंत उपस्थित होते.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची २०२२-२५ ची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी २७ डिसेंबर ते दोन जानेवारीदरम्यान उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर तीन जानेवारी रोजी अर्जांची छाननी होणार असून, त्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जे. एस. सहारिया यांनी हा कार्यक्रम जाहीर केला. मात्र, गुरुवारी पत्रकार परिषदेत वाल्हेकर यांनी निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
वाल्हेकर म्हणाले, ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची २०२२ ते २०२५ या कालावधीसाठीची निवडणूक प्रक्रिया ही सुप्रीम कोर्टाच्या शिफारशींना धरून नाही; तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची घटना ही फक्त धर्मादाय आयुक्तांकडे सादर केल्याचा दावा केला आहे. त्या घटनेला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. असे असतानाही ही निवडणूक होत आहे. घटना मंजूर नसताना ही निवडणूक होतेच कशी?’
वाल्हेकर यांनी आणखी दुसरा एक मुद्दा उपस्थित केला. या निवडणुकीत सुरुवातीला १६ कौन्सिलरची अर्थात सर्वोच्च समितीच्या सदस्यांसाठीची निवडणूक होईल. सोळा सदस्यांमधूनच पाच पदांसाठी निवडणुक लढवता येईल. यात त्रुटी दाखविताना वाल्हेकर म्हणाले, ‘पहिला मुद्दा असा की आधी सर्वोच्च समिती सदस्यांची निवडून कशी होऊ शकते. आधी अध्यक्ष-उपाध्यक्ष अशी पदाधिकाऱ्यांची निवडणूक होणे अपेक्षित आहे. जर आधी सर्वोच्च समिती सदस्यांची निवडणूक होत असले, तर हेच सभासद पदाधिकारी म्हणून निवडणूक लढवू शकणार आहेत. जे सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार नाही.’

आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मतदानाच्या अधिकाराबाबतही वाल्हेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, ‘या घटनेत आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मतदानाचा अधिकार नाही. एमसीएने आंतरराष्ट्रीय खेळाडूंची निवडणूक दाखवून खेळाडू प्रतिनिधींचा अधिकार काढून घेतला आहे. याबाबत घटनेमध्ये बदल करताना निवडणूक प्रक्रियेत आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मतदान अधिकार देताना त्यांच्यामधील निवडणूक रद्द करताना निवडणूक अधिकारी यांनी ही घटना अयोग्य असल्याचे सिद्ध केले आहे.’
अॅड. नीला गोखले यांनी सादर केलेला इ-मेल वर निवडणूक जाहीर करणे योग्य नव्हते. कारण सुप्रीम कोर्टाने किंवा समिती एमसीएच्या घटनेला मान्यता दिल्या बाबतचा कोणताही उल्लेख इ-मेल मध्ये नाही.  

जालना क्रिकेट असोसिएशनला निवडणुकीचा अधिकार देताना जुने सभासद ‘डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन जालना’ यांचा अधिकार काढून घेतला. वास्तविक त्यांनी सर्व पुरावे देऊन सुद्धा जुन्या संघटनेवर अन्याय केला आहे, असा आरोप अनिल वाल्हेकर यांनी केला.
ते पुढे म्हणाले, ही निवडणूक प्रक्रियाच बेकायदेशीर आहे. निवडणूक होण्याला आमचा विरोध नाही. मात्र, त्यात पारदर्शकता हवी आणि घटनेनुसार, सुप्रीम कोर्टाच्या शिफारशींनुसार ती व्हावी.,तरी योग्य विचार करून निवडणूक अधिकारी यांनी निर्णय करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका निवडणुकीचा बिगुल सोमवार नंतर …

मुंबई- राज्यातील २९ महापालिकेत प्रशासक राज आहे. मात्र,...

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...