विधानसभाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न
अलिबाग- यंदा निसर्ग चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले. मासेमारांचे फार मोठे नुकसान झाले. सरकारला वारंवार सांगितले, पण, दुर्दैव म्हणजे कोणतीही मदत या सरकारने केली नाही.पण आज हा कार्यक्रम आयोजित करून गरिब मासेमारांना उपयोगी साहित्याची मदत देण्यात येत आहे ही आनंदाची गोष्ट आहे असे प्रतिपादन विधानसभाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले
कोळी महासंघातर्फे आयोजित कोळी-मच्छिमार बांधवांना विविध साहित्य वितरणाचा कार्यक्रम विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. सोबत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते, तसेच माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रमेशदादा पाटील, भाई गिरकरजी आदी यावेळी उपस्थित होते.
सुमारे 2000 लाभार्थ्यांना विविध उपयोगी वस्तुंचे वाटप यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले की, यंदा निसर्ग चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले. मासेमारांचे फार मोठे नुकसान झाले. सरकारला वारंवार सांगितले, पण, दुर्दैव म्हणजे कोणतीही मदत या सरकारने केली नाही.
पण आज हा कार्यक्रम आयोजित करून गरिब मासेमारांना उपयोगी साहित्याची मदत देण्यात येत आहे.
आपल्या सरकारच्या काळात शीतपेट्या देऊन महिला मासेमारांना मदत करण्यात आली. आज केंद्रात शेतीप्रमाणेच संपूर्ण सवलती आणि योजना मासेमार बांधवांसाठी राबविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री मस्त्यसंपदा योजनेतून, सागरमालातून मोठ्या पायाभूत सुविधा निर्मितीचे काम करण्यात येत आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.
या समुद्राचे खरे मालक तुम्ही आहात. मुंबईतील कोळीवाड्यांचे सीमांकन करून ते खर्या अर्थाने मासेमारांचेच असले पाहिजे, हे आपल्या काळात सुनिश्चित केले गेले.आता हरिदास समितीचा अहवाल लागू करण्यासाठी नवीन सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
हे मच्छिमार बांधव पालघर पासून गोवापर्यंत मच्छिमारीचे काम करतात . आजही वर्षानुवर्ष या ठिकाणी अशाच पद्धतीचा पारंपरिक व्यवसाय ही मंडळी करत आहेत, एका बाजूला जग तंत्रज्ञानाकडे गेला असताना आता कोळी समाजाला मार्गदर्शन करून ताकद देण्याची खरी आवश्यकता आहे,असे प्रतिपादन विधानपरिषदचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केले.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले आहे या राज्याने ते पाहिलं आहे ,त्यांनी दिलेला शब्द किंवा वचन ते नेहमी पाळतात. शब्दाची जाणीव असलेला नेता,खऱ्या अर्थाने मच्छिमारंसाठी काम करणारा नेता आणि त्या विश्वासाने आज संपूर्ण कोळी समाज आणि मच्छिमार बांधव देवेंद्रजी यांच्या मागे आहेत . मच्छिमारांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्याचं काम देवेंद्र जी च्या नेतृत्वखाली या सरकार ने केले. अनेक कधी नव्हे तितक्या जेटटी कोकणात झाल्या. आमचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेब होते , आदरणीय फडणवीस साहेबाच्या माध्यमातून आम्ही कोकणच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आम्ही कोकणवासी आपले ऋणी आहोत. या कोकणला नेतृत्व देण्याचं काम , तर या कोकणला विकास देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी या राज्यात केले असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून माझ्यावर आज जबाबदारी दिली , कोकणचे मच्छिमार बांधव भाजपवर विश्वास टाकतात,आपण या मेळावाच्या माध्यमातून आपल्याला शब्द देतो कि भाजप हा कोळी समाज, मच्छिमार बांधवांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही असेही दरेकर यांनी सांगितले.

