पुणे:दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. तसेच दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
शरद गोसावी म्हणाले,४ ते ३० मार्च दरम्यान लेखी परीक्षा होणार असून १४ ते ४ मार्च तोंडी परीक्षा होईल अशी माहिती देण्यात आली आहे. ७० ते ८० गुणांच्या पेपरला अर्धा तास अधिक वेळ दिला जाणार असून ५० ते ६० गुणांच्या पेपरला १५ मिनिटं अधिक वेळ दिला जाईल.
10 वी ची तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारीपासून होणार आहे. कोविड १९ मुळे शाळा तिथं उपकेंद्र करण्यात येईल. एका वर्गात जास्तीत जास्त २५ विद्यार्थी बसतील अशी व्यवस्था असेल. सोशल डिस्टन्सिंगसाठी झिगझॅग पद्धतीने विद्यार्थ्यांना बसवले जाईल. असेही शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
यंदा बहिस्थ शिक्षक परीक्षक म्हणून न नेमता शाळेतील शिक्षक परीक्षक म्हणून काम पाहतील. बोर्डाच्या परिक्षेसाठी लसीचे 2 डोस घेणे बंधनकारक आहे. परीक्षा केंद्रांची संख्या चौपटीनं वाढविण्यात येतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पेपरसाठी अतिरिक्त वेळ दिला जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

