Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महाराष्ट्रात कोरोनामुळे एक हजारपेक्षा अधिक मृत्यू

Date:

मुंबई. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या गुरुवारी एक हजारांच्या पुढे गेली. मुंबई कोरोनाचा केंद्रबिंदू बनली आहे, येथे राज्यातील 60% मृत्यू झाले. जगातील 198 देशांमध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावरून महाराष्ट्रात परिस्थिती कशी बिघडत चालली याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. या 198 देशांमध्ये इस्त्राइल, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका यांचा समावेश आहे.

यातील पाकिस्तान असा देश आहे ज्याची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात 11 कोटी तर पाकिस्तानात 22 कोटी लोक राहतात. जागतिक कोरोना मीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगातील 213 देश आणि आयलँड कोरोनाने प्रभावित झाले आहेत. यापैकी, अशी 23 देशे आहेत जिथे कोरोनामुळे महाराष्ट्रपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

एप्रिल आणि मे मध्ये 98% मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण 9 मार्च रोजी आढळला होता. तर 17 मार्च रोजी कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. कोरोनामुळे राज्यात 31 मार्चपर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 302 प्रकरणे समोर आली होती. यानंतर कोरोनाचा संसर्ग इतक्या वेगाने पसरला की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच महाराष्ट्र देशातील सर्वात मोठे मृत्यू आणि संसर्ग असलेले राज्य बनले. देशातील एकूण प्रकरणांपैकी 32% प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. तसेच 38% मृत्यू देखील याच राज्यात झाले. मे मध्ये मृत्यूंचा एक नवीन ट्रेंड दिसून आला. आता येथे दररोज 50 हून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे.

तज्ज्ञ म्हणाले- धारावीमध्ये जगातील सर्वात जास्त विध्वंस होण्याचा धोका

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनामुळे आतापर्यंत 30 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 500 पेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला आहे. जर येथे शक्य तितक्या लवकर संसर्ग नियंत्रित झाला नाही तर जगातील सर्वात भयानक आपत्ती येथे येऊ शकते, अशी चिंता जगातील मोठ्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आणि इबोलासाठी काम करणार्‍या कृतिका कपाल्ली यांनी याबाबत चेतावणी दिली आहे. त्यांनी ट्वीट केले होते की, “गेल्या अनेक महिन्यांपासून मला याची चिंता होती. भारतातील लोकसंख्या आणि धारावीसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने रहात असलेल्या लोकांमुळे ही चिंता साहाजिकच आहे. येथे कोरोना वणव्यासारखा पसरू शकतो आणि अकल्पनीय मृत्यू आणि विनाश आणू शकतो.”

2.6 चौरस किलोमीटरमध्ये राहतात 10 लाख लोक

जगातील या सर्वात मोठ्या झोपडपट्टीमध्ये सुमारे 2.6 चौरस किलोमीटर क्षेत्रात 10 लाख लोक राहतात. येथे 10 बाय 10 फूटाची खोली 8 ते 10 लोकांचे घर असते. 73 टक्के लोक सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. एखाद्या शौचालयात 40 तर कुठे 12 आणि 20 जागा असतात. दररोज सुमारे 60 ते 70 लोक एक सीट वापरतात, म्हणजेच एका दिवसात एक हजाराहून अधिक लोक सार्वजनिक शौचालय वापरतात.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेशोत्सव आता महाराष्ट्र महोत्सव:पुण्यात गणेश मंडळांकडून जल्लोष

पुणे: कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासने यांच्या मागणीनुसार आज...

पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. १० : पुणे-नाशिक...

‘बालभारती’ची नवीन सुसज्ज इमारत लवकरच:शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि.१० : ‘बालभारती’ची मुख्य इमारत अत्यंत कमकुवत झाल्यामुळे...

हिंजवडीकरांच्या समस्या सोडविण्यासाठी नियोजनाचा बृहत आराखडा सादर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि.१०- पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडी, अतिक्रमण,...