मोदी सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला; शेतकरी देशभर अंबानी-अडानींच्या प्रोडक्टचा बायकॉट करणार

Date:

नवी दिल्ली -कृषी कायद्यावरुन सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतरही तोडगा निघू सकला नाही. शेतकऱ्यांनी आज मोदी सरकारचा प्रस्ताव फेटाळला असून, आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. मंगळवारी गृहमंत्री अमित शाहंच्या भेटीनंतर बुधवारी सरकारने शेतकरी नेत्यांना प्रस्ताव पाठवला होता. पण, शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

या प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर शेतकर्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. यात शेतकऱ्यांनी 4 महत्त्वाच्या घोषणा केल्या..

1. शेतकरी शनिवारी देशभरातील टोल प्लाजा फ्री करणार. दिल्ली-जयपूर हायवे बंद केला जाईल.

2. देशभरातील सर्व जिल्हा मुख्यालयात आंदोलन केले जाईल. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि राजस्थानातील शेतकरी यात सामील होतील. ज्यांना या आंदोलनात सामील होता आले नाही, ते शेतकरी दिल्लीकडे जातील.

3. अंबानी-अडानींचे मॉल, प्रोडक्ट आणि टोलचा बायकॉट केला जाईल. जियोचे प्रोडक्ट्सदेखील बायकॉट केले जाणार.

4. भाजप नेत्यांचा नॅशनल लेव्हलवर बायकॉट केला जाईल. त्यांचे बंगले आणि कार्यालसांसमोर आंदोलन केले जाईल.

सरकारने शेतकऱ्यांच्या सर्वात मोठी मागणीस नकार दिला

सरकारने शेतकऱ्यांच्या प्रमुख 10 मुद्द्यांपैकी सर्वात महत्वाची मागणी असलेल्या कृषी कायद्यास रद्द करण्यास नकार दिला. 5 मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले जाईल आणि 4 मुद्द्यांमध्ये बदल करण्यास तयार झाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...