सुभाष जगतापांवर खोटा गुन्हा नोंदविला, दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करा,अन्यथा राज्यभर आंदोलन : रमेश बागवे

Date:

पुणे -झोपडपट्टी मधील महिलांना शिधापत्रिका व रेशन धान्य बाबत जाब विचारण्यास गेलेल्या  माजी सभागृह नेते, अन्नधान्य वितरण समिती सदस्य,माजी नगरसेवक सुभाष जगताप यांचेवर अधिकाऱ्यांनी पोलिस तक्रार केल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले.सुभाष जगताप यांच्यावरील खोटी कारवाई न थांबवल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा माजी गृहराज्यमंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे यांनी यावेळी दिला.तसेच मातंग समाजाच्या संघटनाचे शिष्टमंडळ लवकरच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,शरद पवार व महविकास आघाडी च्या नेत्यांना भेटणार असल्याचे सांगितले.यावेळी दोषी अधिकारी यांच्यावर चौकशी समिती नेमून कारवाई करावी,सुभाष जगताप यांच्यावरील खोटी कारवाई तत्काळ थांबवण्यात यावी,कामचुकार आणि दप्तर दिरंगाई करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करावी आदी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्यावरील दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी आज सकाळी 11 वाजता पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध करून तीव्र निदर्शने करण्यात आली.या आंदोलनामध्ये माजी मंत्री रमेश बागवे,लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले, नगरसेवक अविनाश बागवे,निलेश वाघमारे सत्यशोधक बहुजन आघाडी चे संस्थापक सचिन बगाडे,रिपब्लिकन युवा मोर्चा चे नेते राहुल डंबाळे,लहुजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हतागले,पुणे शहर मातंग समाज सचिव संजय केंदले,मातंग एकता आंदोलनाच्या महिला अध्यक्ष राजश्री ताई अडसूळ,गोविंद साठे यासह पुणे शहरातील विविध दलीत,मातंग समाजाच्या संघटनेचे नेते पदाधिकारी,महीला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे जिल्हा मातंग समाज संघटनेचे श्री संजय केंदळे म्हणाले की, “सुभाष जगताप हे गेल्या तीस वर्षांपासून सहकारनगर, पर्वती या परिसरामध्ये सामाजिक कार्यांमध्ये कार्यरत असून गोरगरीब, कष्टकरी ,वंचित, उपेक्षित समाजासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. या समाजातील कुटुंबांना वेळोवेळी न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन उपोषण या माध्यमातून गेली तीस वर्ष श्री सुभाष जगताप यांनी आमच्या सर्व समाज बांधवांची सेवा केली आहे. असे असताना गेल्या काही दिवसांत पासून रेशनिंग संबंधित अनेक तक्रारी श्री. सुभाष जगताप यांच्याकडे येत होत्या. परिसरातील नागरिकांच्या रेशनिंगच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी श्री सुभाष जगताप यांनी वारंवार संबंधित विभागाच्या कार्यालयात पाठपुरावा केला. परंतु शेवटी या नागरिकांप्रमाणेच त्यांनादेखील अशाच प्रकारची उडवाउडवीची उत्तरे देत अरेरावीची भाषा करणाऱ्या अधिकाऱ्यांना श्री. सुभाष जगताप यांनी खडे बोल सुनावले, आमच्या न्याय व हक्कासाठी लढताना झालेल्या या घटनेत अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याऐवजी श्री. सुभाष जगताप यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.
गेल्या काही दिवसात श्री सुभाष जगताप यांनी सहकारनगर परिसर चालल्या चालणाऱ्या अवैध धंद्यांवर धाड आवाज उठवल्याने प्रशासकीय यंत्रणेचा त्यांच्यावर रोष होता, तो रोष या घटनेत गुन्हा नोंदवतांना दिसून आला व जामीन मिळणार नाही अश्या प्रकारची कलमे लावण्यात आली. तरीही न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याने त्यांना तात्काळ जामीन मंजूर झाला आहे.पुणे जिल्हा मातंग समाज या घटनेचा जाहीर निषेध करत असून येत्या काही दिवसात जर हे खोटे गुन्हे मागे घेण्यात आले नाही तर भविष्यात यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल “

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...