पडले फिक्के,सारे खोक्के ; शिंदेंनी लिहून दिलेले वाचले, भाषण सुरू असतानाच अर्ध्या लोकांनी मैदान सोडले

Date:

जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे , निहार ठाकरे यांच्या उपस्थितीने काय साधले ?

मुंबई- बसेस , खाना खजाना , बक्षिसी असा दिवसभर टीव्ही वर आणि अन्य माध्यमांतून नंबर १ च्या मोठ्ठ्या जाहिराती देऊन मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याचा सपशेल फ्लॉप शो झाला, अशी टीका आज शिवसेनेने केली आहे. शिंदे यांनी कोणी तरी लिहून दिलेले भाषण वाचले. त्याचा संदर्भ लावताना शिंदे अनेकदा अडखळले. त्यामुळे त्यांच्या भाषणात सूर आणि नूरही नव्हता, असे शिवसेनेचे मुखपत्र सामनात म्हटले आहे.तर पुण्यातल्या शिवसैनिकांनी सारे खोक्के पडले फिक्के म्हणत उद्धव ठाकरेंनी जिंकले असे म्हटले आहे .जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे , निहार ठाकरे यांच्या उपस्थितीने काय साधले ? असाही सवाल शिवसैनिकांनी केला आहे.

शिंदेंच्या भाषणावर टीका करताना शिवसेनेने म्हटले आहे की, महाविकास आघाडीने केलेल्या कामांची यादीच स्वतःच्या सरकारची कामे म्हणून वाचून दाखवणे, मोदी-शहांचे गोडवे गाणे आणि केलेला फुटीरपणा कसा योग्य आहे याची कॅसेट शिंदेंनी पुनः पुन्हा वाजवली. त्यातच त्यांचे भाषण सुरू असताना अर्ध्या लोकांनी मैदान सोडून थेट घराची वाट धरली. त्यामुळे शिंदेंनी करोडोंचा खर्च करून माणसे आणली, पण त्यांना त्याच गर्दीने धोका दिल्याची सर्वत्र चर्चा सुरू होती.

बीकेसी मैदानावर गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाने गावागावातून लोकांची जमवाजमव केल्याचे स्पष्टपणे दिसत होते, असा आरोपही शिवसेनेने केला. पुढे शिवसेनेने म्हटले की, बीकेसीच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी सव्वा तासाच्या भाषणातील प्रत्येक ओळ वाचून दाखवली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात जोश नव्हता. तसाच उपस्थितांमध्येही जोश दिसत नव्हता. टाळ्याही पडत नव्हत्या. भाषण लांबत गेले. शेवटी कंटाळलेल्या लोकांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केली

दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना थेट धमकीच दिली. आमच्या विरोधात बोलल्यावर काय होते ते माहिती आहे ना ,अशा शब्दांत धमकावले, असा हल्लाबोल शिवसेनेने केला.

सर्व मराठी टीव्ही चॅनेल तसेच युट्यूबवर शिवतीर्थावरील शिवसेनेच्या मेळाव्याचे व बीकेसीवरील मेळाव्याचे थेट प्रक्षेपण सुरू होते. याबाबत शिवसेनेने एका वृत्तवाहिनीचा दाखला देत दावा केला की, एका चॅनेलवर शिवतीर्थावरील शिवसेनेचा मेळावा बघणाऱ्यांची संख्या 70 हजार तर याच चॅनेलवर बीकेसीचा मेळावा बघणाऱ्यांची संख्या फक्त 15 हजार होती. उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू झाले तेव्हा त्या चॅनेलवर भाषण ऐकणाऱ्यांची संख्या 86 हजारांपेक्षा अधिक तर इतर सर्व वाहिन्या मिळून उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकणाऱ्यांची संख्या सव्वा लाख होती. तर, सर्व वृत्तवाहिन्यांचे आकडे मिळूनही बीकेसीतला मेळावा 50 हजारांपेक्षा अधिक लोकांनी लाईव्ह पाहिला नाही. उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकणाऱ्यांचा आकडा वाढत होता तर एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकणाऱ्यांची संख्या कमी होत गेली.

राज्याच्या विविध भागांतून शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी आलेल्या 100 पेक्षा जास्त गाड्यांवर छात्रभारतीने पोस्टर झळकावून 0 ते 20 पटसंख्येच्या शाळाबंदीच्या निर्णयाचा निषेध केला, असा दावाही शिवसेनेने केला. शिवसेनेने म्हटले की, राज्य सरकारने विद्यार्थी संख्या कमी असल्याचे कारण पुढे करत खेड्यापाड्यातील जिल्हा परिषदेच्या हजारो शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. या निर्णयाचे पडसाद ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर उमटले असून घराजवळची शाळा बंद झाल्याने हे विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकले गेले आहेत. याविरोधात छात्रभारतीने आंदोलनाची हाक दिली आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निषेधाचे पोस्टर बीकेसीवरील मेळाव्यासाठी येणाऱ्या 100 हून अधिक गाड्यांवर चिकटवले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पत्रकारितेला जनसुरक्षा कायद्याचा फटका बसणार नाही:मुख्यमंत्र्यांचा शब्द

पत्रकार संघटनांबरोबर देवेंद्र फडणवीस यांची बैठक. मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी)-...

धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात डीन डॉ. केळकर,घैसास ही दोषी,पन्नास पानांचा अहवाल सादर

पुणे : मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर आरोग्य विभाग...

अखेर ७ तासांनी सुप्रिया सुळेंनी उपोषण सोडलं; २ मे ला रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार

पुणे:भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर (नसरापूर) येथील बनेश्वर फाटा...