उत्साहाच्या चाहुली…दिवाळी आली (लेखिका :पूर्णिमा नार्वेकर)

Date:

केवढी ही गर्दी, पाय ठेवायला सुद्धा जागा नाही, या गर्दीत कुठे येतोय करोना…दादरच्या रानडे रोडवरची तुडुंब गर्दी पाहून मनातल्या मनात मी पुटपुटले. गेल्याच आठवड्यात या रानडे रोडवर अगदी शुकशुकाट होता आणि आता पाहा, माणसांनी नुसता फुलला आहे. दिवाळीची चाहूलही लागलीय (मोती साबणाची जाहिरात सुरू झाली ना). गेल्या आठवड्यातील सुरक्षित अंतर काय ते ट्रेनमध्ये आता इंचभरही नव्हतं. ‘गर्दी’ या विषयावर व्हाट्सअपवर एक जोक फिरत होता – करोनाने बहुधा स्वतःलाच क्वारंटाईन करून घेतलं आहे १४ दिवस! खरंच की त्याचा प्रत्यय रानडे रोडवर पदोपदी येत होता. पाडव्यापासून ते दसऱ्यापर्यंत सगळे सण या करोनामुळे बंदिस्त वातावरणात पार पडले, मात्र लोकांचा संयम सुटला आणि दिवाळीच्या खरेदीसाठी हळूहळू गर्दी होऊ लागली…अर्थात मास्क लावून आणि सोबत सॅनिटायझर घेऊनच.दसऱ्यानंतर काही दिवसांनी  बाजारातील मंदी मंदावली आणि उत्साहाची झळाळी यायला लागली. ऑनलाईन दिवाळी धमाक्याचा दसऱ्यानंतरच शुभारंभ झाला होता. रांगोळी शिकविण्याच्या ऑनलाईन क्लासेसची दुकानं थाटली गेली. अमेझॉन, मिन्त्रा, फ्लिपकार्ट…दिवाळी बम्पर सेलचा धुमधडाका सुरू झाला. ज्यांना बाहेर जाऊन खरेदी करता येत नाही त्यांच्या तर पथ्यावरच पडलं. लॉकडाऊनपासून तरुण मंडळी, गृहिणी ते जेष्ठ नागरिक सर्वच टेक्नोसॅव्ही झाले आहेत. फोन घेण्या आणि करण्यापुरता मर्यादित वापर करणाऱ्या आजीबाई सुद्धा आता ऑनलाईन कुठे काय मिळते, काय काय ऑफर्स आहेत ते बघून नातीला सूचना करू लागल्या आहेत. ऑनलाईन जाहिरातबाजीला यंदा करोनामुळे सोन्याचे दिवस आले आहेत.दिवाळी फराळाच्या ऑनलाईन ऑर्डर्सचे व्हाट्सअपवर दिवसाला किमान ३-४ तरी नवीन मेसजेस येतातच. तयार भाजणी पीठ, लाडू पीठ, अनारसा पीठ, तोरण, कंदील, पणत्या…सध्या करोनाऐवजी या मेसेजेसची सर्व ग्रुपवर रेलचेल आहे. बाहेर न पडता दिवाळी साजरी करायची या अपरिहार्यतेने बहुतेकांनी आपापल्या परीनं पर्याय शोधून काढले, मग त्यात ‘साहित्य फराळ’ मागे कसा राहील. दिवाळी व दिवाळी अंक यांचं नातं अतूट आहे व त्यात खंड पडू द्यायचा नाही, यासाठी काही प्रकाशकांनी दिवाळी अंक ऑनलाईन प्रकाशित केले आहेत. सालाबादप्रमाणे पेपर स्टॉलवर दिवाळी अंक दिमाखात विराजमान झाले आहेत म्हणा. दिवाळी पहाटचे कार्यक्रम यावर्षी ऑनलाईन होणार असून सुरांची मैफल याची डोळां रंगणार आहे. दिवाळी पहाटेनिमित्त होणाऱ्या पारंपरिक वेशातील मिरवणुकीस यावेळी काट मारली गेली तरी काही जणांनी ऑनलाईन सेलिब्रेशनचा पर्याय शोधून काढलाच. प्रत्यक्ष भेटता येत नसलं म्हणून काय झालं, दरवर्षी प्रमाणे नटूनथटून परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटीगाठी होणार आहेत…त्याची जय्यत तयारीही चालू आहे. एकूण दिवाळी आणि दिवाळी पहाट युनिक पद्धतीने कशी साजरी करायची यावर  मित्रमैत्रिणींच्या तसेच फॅमिली ग्रुपमध्ये जोरदार चर्चासत्र झडते आहे. त्यास भर म्हणून ऑनलाईन खरेदीची पार्सलं कधीचीच घरी येऊन पडली आहेत.’वर्क फ्रॉम होम’मुळे कामाचा व्याप असला तरी महिलावर्ग आनंदी आहे, कारण मनासारखा दिवाळी फराळ करता येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात नवनवीन रेसिपी बनवून तयार झालेले घरचे बल्लवाचार्य त्यांच्या दिमतीला आहेतच! बिनआवाजाचे फटाके एकच दिवस का होईना पण वाजवता येणार आहे ना, यावर घरातील बच्चे कंपनी खूष आहे. दुःखाचे, भीतीचे सावट सरून सर्वत्र उत्साहाचे दीप तेवू लागले आहेत. रानडे रोडच्या गर्दीतून वाट काढताना माणसांच्या चेहऱ्यावर ओसंडणारा उत्साह मी न्याहाळत होते. हे चैतन्य पाहून मनोमन देवाजवळ एकच प्रार्थना केली – करोना कायमचाच आता क्वारंटाईन होऊ दे आणि आशेच्या किरणांचे दीप घरोघरी उजळू दे देवा…शुभ दीपावली.

© पूर्णिमा नार्वेकर, दहिसर

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...