पुणे – लॉक डाऊनच्या कालावधीत तंदुरुस्तीचे महत्व लक्षात घेऊन निर्माण झालेल्या फिटनेस बडीज (तंदुरुस्त मित्र) हा ग्रुप आता तंदुरुस्तीचे महत्व पटविण्यासाठी थेट प्रयत्न करणार आहे. यासाठी १६ डिसेंबर रोजी ते सायकलने पुणे ते गोवा असा प्रवास करणार आहेत. चार दिवस ही मोहिम चालणार असून, यामध्ये एकूण ५०० हून अधिक कि.मी. अंतर ते पार करणार आहे. या प्रवासात काही ठिकाणी विसावा घेत ते १९ डिसेंबर रोजी गोवा येथे पोचणार आहेत.
तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणे हा आणखी एक या मोहिमेचा हेतु आहे. आपण तंदुरुस्त तर देश तंदुरुस्त या पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या संदेशाने हा ग्रुप प्रेरित झाला. शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्याचा आम्ही या प्रवासात प्रयत्न करणार आहोत. सध्या वेगवान जीवनाचा फटका सर्वांनाच बसत आहे. याबाबतची खेड्यापाड्यात जागरुकता निर्माण करण्यासाठी हा ग्रुप ग्रामीण भागातील मुलांना दोरीवरच्या उड्यांची भेट देणार आहे. तंदुरुस्तीचा समावेश असलेले आयुष्य जगणे हे केव्हाही चांगले आणि त्यासाठीच सर्वांसाठी तंदुरुस्ती हाच हा या ग्रुपचा उद्देश आहे.
जेव्हा प्रेमाची शक्ती सत्तेच्या ताकदीवर मात करते, तेव्हा जगात शांती, श्रद्धा आणि सलोखा पूर्ववत निर्माण होईल. आमच्या या सायकल प्रवासाने जगभरात शांततेचा संदेश जाणार आहे. सायकल प्रवासात हा ग्रुप पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी देखील प्रयत्न करणार आहे. यासाठी ते प्रवासात विविध बिया बरोबर घेऊन जाणार आहेत आणि वाटेवर विविध ठिकाणी पेरणार आहेत. आपल्याला आवश्यक प्राणवायू साठविण्यासाठी आणि जगातील वन्य जीवनांना आसरा तसेच जीवन दान मिळण्यासाठी भविष्यात याचा फायदा हेणार आहे.
या सायकल मोहिमेच्या पूर्वसंध्येला आनंद चोरडिया यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले,’देशाचा नागरिक म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्यापासून आपल्याला पळता येणार नाही. प्रामाणिकपणे आपण ती पाळली पाहिजेत. हवामानात होणारा बदल हा सध्याचा एक ज्वलंत मुद्दा आहे. या बदलाने आपल्याला जणू वेठीला धरले आहे. त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी याच क्षणापासून आपण पावले उचलण्याची गरज आहे. शाश्वत विकास ही भावी पिढ्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेची ओळख करून देते. अशा उपक्रमातून समाजात निरोगी जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.’
फिटनेस बडीज विषयीकोविड १९च्या प्रादुर्भावामुळे लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक विपरीत परिणाम झाले. यातून मार्ग काढण्याच्या उद्देशाने आणि या विश्वाला राहण्यासाठी अधिक सुंदर बनवण्याच्या उद्देशाने हा ग्रिप एकत्र आला. या ग्रुपमधथ्ये आनंद चोरडिया, हितेश पगारिया, सुजित भाटेवरा, रुपेश सोळंकी, निल गुजर, प्रीत सोळंकी, जतीन फुलपगार, मनोज लालवानी, विपुल परमार, विक्रम परमार, प्रेमित जैन यांचा समावेश आहे. जागतिक शांती आणि तंदुरुस्तीची जाणीव पसरवणे हा या ग्रुपचा हेतू आहे. वसुधैव कुटुंबकम (जग एकच कुटुंब आहे) सार्थ ठरण्यासाठी हा ग्रुप प्रयत्नशील आहे.

