ईडीचे अनिल देशमुख यांना चौकशीसाठी समन्स;त्यांच्या दोन्ही पीएंना अटक

Date:

मुंबई-

 अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शनिवारी अनिल देशमुख यांना मुंबईमधील आपल्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने रात्री उशिरा त्यांचे खाजगी सचिव संजीव पलांडे आणि वैयक्तिक सहाय्यक कुंदन शिंदे यांना अटक केली.यापूर्वी ईडीने शुक्रवारी देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरमधील 6 ठिकाणी छापेमारी केली होती.

देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहायकांना दोघांना मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (PMLA) अटक करण्यात असून त्यांना आज सकाळी 11 वाजता कोर्टात हजर केले जाणार आहे.

ईडीने शनिवारी देशमुख यांचे निकटवर्तीय सागर नावाच्या व्यक्तीच्या नागपूरमधील एका ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. सागर हा अनिल देखमुख यांच्या तीन डझनहून अधिक कंपन्यांमध्येही संचालक होता. सागर नावाच्या या व्यक्तीचा कोलकातामध्ये कोट्यवधींचा व्यवसाय असल्याचे सांगितले जात आहे.

देशमुख म्हणाले – आयुक्त असताना परमबीर यांनी आरोप का केले नाही?
ईडीच्या या छापेमारीनंतर अनिल देशमुख यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, परमबीर सिंह हे आयुक्त असताना आरोप का केले नाही? त्यांना पदावरुन दूर केल्यानंतर माझ्याविरोधात खोटे आरोप केले आहे. एनआयएने अटक केलेले सर्व पोलिस अधिकारी थेट परमबीरला रिपोर्ट करायचे. पदावरुन हटवण्याचे कारण म्हणजे परमबीर सिंह यांची भूमिका संशयास्पद होती. अनिल देशमुख पुढे म्हणाले की, ‘मी ईडीच्या या कारवाईत पूर्ण सहकार्य करीत असून भविष्यातही मी असे करत राहील. सत्य काय आहे हे लवकरच सर्वांसमोर येईल.

9 तास केली चौकशी
ईडीच्या या पथकात फॉरेन्सिक टीमचा ही समावेश होता. अनिल देशमुख यांचे सरकारी निवासस्थान ज्ञानेश्वरी येथेही झाडाझडती सुरू होती. 9 तास ईडी अधिकाऱ्यांनी दोन्ही निवासस्थांची झडती घेतली. नागपूरमध्ये यापूर्वी ईडीच्या पथकांनी 16 जून रोजी दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्यावर धाडी टाकून काही कागदपत्रे जप्त केली होती.

मोबाइल, कागदपत्रे जप्त
ईडी अधिकाऱ्यांनी देशमुख यांच्या कुटुंबीयांचे आणि निकटवर्तीयांचे मोबाइल आणि डिजिटल डाटा ताब्यात घेतला. या वेळी देशमुख ‘ज्ञानेश्वरी’ निवासस्थानी होते. देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य आणि कर्मचारी सुखदा इमारतीमधील घरी होते. या सर्वांची चौकशी झाली. काही कागदपत्रे जप्त करण्यात आली.

4 कोटी हप्त्याचा तपास
ईडीने या प्रकरणात मुंबईतील काही बारमालकांचे जबाब यापूर्वी नोंदवले होते. त्यात 10 बारमालकांनी देशमुख यांना काही महिने मासिक 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली होती. या गंभीर प्रकाराची चौकशी करण्यासाठी मुंबई व नागपुरात छापेमारी करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

प्रकरण काय?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिरसिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी दरमहिन्याला 100 कोटी रुपये हप्ता जमा करायला सांगितले होते, असा गंभीर आरोप त्यात होता. परिणामी देशमुखांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने एप्रिलमध्ये दिल्लीत गुन्हा दाखल केला होता. याच आधारे ईडीने मे महिन्यात पैशाच्या अफारातफर प्रकरणी गुन्हा दाखल केला. शेल कंपन्या किंवा हवालामार्फत पैसा गुंतवला आहे का, याचा तपास ईडी करत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...