सोलापूर – काही पुरावे असतील म्हणूनच ईडीने सरनाईकांवर कारवाई करत धाड टाकली आहे.चूक नसेल तर सरनाईकांनी घाबरायचे कारण नाही अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली आहे.
फडणवीस याविषयी बोलताना म्हणाले की, ‘ज्यांनी चूक केलेली नाही त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. काही पुरावे मिळाले असतील म्हणूनच ईडीकडून कारवाई करण्यात आली असेल. ईडी पुरावे असल्याशिवाय कारवाई करत नाही’ प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडी पथक दाखल झाल्याची माहिती आहे. तसेच प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले आहे.
टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहिम सुरू असल्याची माहिती आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यानुसार प्रताप सरनाईकांसंबंधित 10 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे.

