आर्थिक विषमता देशाच्या विकासाला बाधक-  कुलगुरू डॉ. अजित रानडे

Date:

पुणेर:“आर्थिक विषमता देशाच्या विकासाला बाधक आहे. देशातील सर्वसाधारण व्यक्तीना मुख्य प्रवाहात आणून ही विषमता दूर केली जाऊ शकतो. या साठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची खूप मोठी गरज आहे. त्यातूनच ही विषमता दूर होऊ शकते. असे मत पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित २७वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेत ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ या विषयावर आयोजित तिसरे पुष्प गुंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, डॉ. मिलिंद पात्रे, डॉ. अंजली साने व डॉ. शालिनी शर्मा उपस्थित होते.
डॉ. अजित रानडे म्हणाले,“जागतिक स्तरावर पाहता इंग्लंड, जर्मन या सारख्या देशात आर्थिक विषमता दूर झालेली आहे. पण भारतात पाहता आज ही ८२ टक्के लोक हे दारिद्र रेषेखाली जीवन व्यतीत करतांना दिसत आहेत. देशातील २० टक्के श्रीमंत लोक सत्ता चालवितांना दिसत आहे. त्यामुळे अशी विषमता घालविणे गरजेचे असून व्यक्तींचा आर्थिक स्तर उंचाविणे गरजेचे आहे. लोकांना सामाजिक व आर्थिक प्रवाहाच्या मुख्यधारेत आणावयाचे असेल तर गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच एकमेव शस्त्र आहे.”
“राष्ट्रीय उत्पन्नाचा सर्व समाजाला उपयोग होतो. समाजामध्ये वाढत्य विषमतेमुळे अस्थिरता निर्माण होते. परंतू आपला समाज अध्यात्म, मूल्य आणि नैतिकता यामुळे टिकून आहे. राजकीय समानतेमध्ये सर्वांना एक समान मतदानाचा अधिकार आहे. परंतू सामाजिक आणि आर्थिक विषमतेमध्ये अशी समानता दिसून येत नाही. परंतू राष्ट्रीय उत्पन्न वाढले तर समानता येऊ शकेल.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ मानवाने स्वतःचे खरे स्वरूप ओळखण्याचा प्रयत्न करावा. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा काही वैज्ञानिक शब्दांचा उल्लेख आहे. त्याचा अर्थ समझून घेऊन आपले जीवन व्यतीत करावे. वर्तमानकाळात कुटुंब पद्धत ही हळूहळू विस्कळीत होतांना दिसत आहे. त्यासाठी मुलांना आई वडिलांचे प्रेम मिळणे हे अत्यंत महत्वाचे आहे. देह, बुद्धि, आत्मा आणि मनाचे गणित समजून घेणे आवश्यक आहे.”
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात प्रेरणादायी वक्ता डॉ. संजय उपाध्ये व डीआरडीओचे रिसर्च अँण्ड डेव्हलपमेंटचे संचालक प्रदिप कुरळकर यांनी आपले विचार मांडले.
प्रदिप कुरळकर म्हणाले,“देशातील प्रगत शस्त्रांमुळेच आज येथील सैनिकांन शारीरिक आणि मानसिक बळ मिळते. या शस्त्रसाठ्यांमुळेच कोणत्याही देशाची वाईट नजर आपल्याकडे वळत नाही. वर्तमान काळात डीआरडीओच्या माध्यमातून आर्मिसाठी वेगवेगळे वेपन्स आणि त्यांना वेगवेगळ्या वातावरणात राहण्यासाठीचे साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. डीआरडीओच्या माध्यमातून आवाजा पेक्षा ६ पट गतिेचे मिसाइल, सॅटेलाइट, सूपर सॉनिक मिसाइल, ब्रह्मास्त्र मिसाइल, आकाश मिसाइल आणि समुद्रापासून केवळ ७ फूट उंचीवरून जाणरे मिसाइल हे आपली शक्ती आहे. यामुळे जगभरात आपला दबदबा असल्याचे ही त्यांनी सांगितले.”
प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागत पर भाषण केले.
प्रा. डॉ.पोर्णिमा बागची यांनी सूत्रसंचालन केल. प्रा.डॉ. अंजली साने यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...