शरद पवार साताऱ्यातून निवडणुकीला उभे राहिले तर माघार घेईन – उदयनराजे

Date:

सातारा-आपल्या सातारा लोकसभा मतदार संघात आपल्या विरोधात शरद पवार निवडणुकीला उभे राहिले तर मी माघार घेईन असे वक्तव्य भाऊक होवून उदयनराजे भोसले यांनी इथे केलंय.

लोकसभा पोट निवडणूक 21ऑक्टोबर रोजी होणार आहे असल्याने माजी खासदार उदयनराजेंना दिलासा मिळाला आहे,या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जर निवडणुक लढणार असतील तर मी निवडणुकीतून माघार घेईल असे उदयनराजेंनी प्रसार माध्यम यांच्या सोबत बोलताना सांगितले. 21 ऑक्टोबर रोजी ही पोटनिवडणूक होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यामुळे साताऱ्याचा खासदार दिवाळीपूर्वी ठरणार हे आता निश्चित झालं आहे. साताऱ्याच्या निवडणुकीची तारीख जाहीर होताच, तेथील उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.तर राष्ट्रवादी समर्थकांकडून शरद पवार यांनीच निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, असा आग्रह सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते शशिकांत शिंदे यांचा आपल्या कोरेगाव मतदारसंघासह साताऱ्यातील इतर भागातही चांगला प्रभाव आहे. त्यामुळे उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचंही समजते. तसेच शशिकांत शिंदे,नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते यांची नावेही राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत. मात्र, शरद पवार स्वत: निवडणूक लढवणार असतील, तर मी माघार घेईल,असं उदनयराजेंनी म्हटलं आहे.

वडिलांनंतर शरद पवार यांनीच मला आधार दिला
भाजपात प्रवेश करण्यावरुन होणाऱ्या टीकेबद्दल बोलताना उदयनराजे भोसले यांनी हे सर्व एकदाचे खलास करून टाका असं म्हणत आपला संताप व्यक्त केला. तसंच शरद पवारांबद्दल आपल्या मनात अजूनही तितकाच आदर असून वडिलांनंतर शरद पवार यांनीच मला आधार दिला. ते पोटनिवडणुकीसाठी उभे राहिले तर बरं होईल, म्हणजे मी बोंबलत फिरायला मोकळा होईन असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

राजेशाही असती तर बलात्काऱ्यांना थेट गोळ्या घातल्या असत्या
आपल्यावर राजेशाहीचा आरोप करणाऱ्यांना उत्तर देताना उदयनराजे भोसले यांनी राजेशाही असती तर मी बलात्कार करणाऱ्यांना थेट गोळ्या घातल्या असत्या. विरोधकांनी माझ्यावर राजेशाहीचा आरोप करण्यापेक्षा मुद्द्यांवर आधारित राजकारण करावे असं आवाहन केलं. पुढे बोलताना त्यांनी उगाच कोणाचीही टीका ऐकून घ्यायला आपण काही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. आपण नेहमी अन्यायाच्याविरोधात आवाज उठवला असल्याचं उदयनराजेंनी सांगितलं.

माझी कॉलर आहे…चावेन नाहीतर फाडून टाकेन
टीका करणाऱ्यांना उदयनराजे यांनी माझी स्टाईल हा माझा खासगी प्रश्न आहे. मला गाणी ऐकायला आवडतात. माझी कॉलर मी चावेन नाहीतर फाडून टाकेन. तुम्हाला त्याच्याशी काय देणेघेणे आहे, असा सवालही विचारला.

अन् राजे झाले भावुक

शरद पवार यांच्याबद्दल बोलताना उदयनराजे भावूक झाले होते,त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं ते आदरणीय कालपण होते,आजपण यांच्याबद्दल बोलताना उदयनराजे भावूक झाले होते,त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं ते आदरणीय कालपण होते,आजआहेत, भविष्यातपण राहतील. आज महाळ आहेत,असे म्हणत पूर्वजांची आठवण उदयनराजेंनी काढली. त्यावेळी, त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. त्यांच्यनंतर तेच माझ्यासाठी आहेत. शरद पवार पोटनिवडणूक लढवणार आहेत, अशी चर्चा असल्याचं विचारताच,ते उभारल्यास मी फॉर्म भरणार नाही,असं उदयनराजेंनी जाहीर केलं आहे. पण, दिल्लीतील बंगला आणि गाडी यासाठी मला मुभा द्यावी, असे म्हणत पवारांचं प्रेम मिळावं ही अपेक्षा उदयनराजेंनी व्यक्त केली आहे. त्यामुळे साताऱ्यात शरद पवार विरुद्ध उदयनराजे असा सामना रंगणार नसल्याचं स्पष्ट झालंय.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...