मुंबई, ठाणे ,पालघरला सायंकाळी धुके नव्हे ते धुळीचे वारे ..
मुंबई-हवेत मोठा गारठा असताना मुंबई, आणि पुण्यात आज सायंकाळी सुरुवातीला वाटले धुके पडले कि काय ? पण ते निघाले धुळीचे वारे इमारती, लोकल दिसेनाशी होत होती ,पुण्यात सूर्यास्ताच्या समयी सूर्य देखील धुरकट पांढरा चंद्र भासावा असा दिसला
हवेत धुलीकणांचं प्रमाण वाढल्याचा परिणाम मुंबई, पुण्यात काही ठिकाणी दिसून आला आहे. मुंबईतील उंचच उंच इमारती धुळीच्या वाऱ्यामुळे दिसेनाशा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वारे गुजरात, अरबी समुद्रामार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे.त्यामुळे येत्या १२ तासांमध्ये उत्तर कोकण, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये, आणि काही ठिकाणी धुळीचे वारे ताशी २० ते ३० किमी वेगानं येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे.धुळीच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी दृश्यमानता कमी होण्याचीही शक्यता आहे. हवेतील धुलीकणांचं प्रमाण वाढल्यानं मुंबईत लोकल ट्रेन, आणि उंच इमारती काहीशा अंधुक दिसत असल्याचेही फोटो समोर आले आहेत. तसंच मुंबईत आज सकाळपासूनच हवेची गुणवत्ता खालावल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे वरीष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीतर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

