तुमच्या धमक्यांना अजिबात भिक घालीत नाही, काय करायचे ते करा- आ.चंद्रकांत पाटलांचे जाहीर चॅलेंज

Date:

पुणे : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे “विरोधकांना बघून घेऊ’ही भाषा वापरत आहेत. ही आपली राजकीय संस्कृती नाही. त्यांच्या धमक्‍यांना आजिबात भीक घालत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा,’ अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला चॅलेंज दिले. राज्यात ऍक्‍शन-रिऍक्‍शनचा खेळ सुरू असून त्याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र बसून आचारसंहिता ठरविण्याची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

तेरा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर नको ती लोकं एकत्र आली. सर्वात जास्त आमदार निवडून येऊनही भाजप विरोधी पक्षात राहिली. त्या सरकारला आता एक वर्ष पूर्ण झाली. या एक वर्षात सामान्य माणूस पूर्णपणे भरडला गेला आहे. महिला अत्याचार, मराठा आरक्षण गोंधळ असा सर्व प्रकार या सरकारच्या काळात पहायला मिळाला.” अशी टिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महाविकास सरकारच्या कारभारवर केली. आघाडीच्या सरकाराची काल वर्षपुर्ती झाली.त्यानिमित्त आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते .यावेळी खासदार गिरीष बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शहराध्यक्ष जगदिश मुळीक आदी उपस्थित होते.पाटील म्हणाले,” चंपा काय, टरबुज्या काय ही काय भाषा आहे.ही आपली राजकीय संस्कृतीच नाही. आम्ही उद्धव ठाकरेंना ‘उठा’, अजित पवारांना ‘अपा’ शरद पवारांना “शपा’ आणि जयंत पाटील यांना “जपा’ म्हटले तर चालेल. ऍक्‍शन रिक्‍शनच्या खेळात सर्वसामान्य जनता भरडली जात आहे.”

हे अनैसर्गिक, अकृत्रिम सरकार स्थापन झाल आहे. परंतु मी स्वत: किंवा देवेंद्र फडणवीस यांनी कधीही हे सरकार येत्या तीन महिन्यात पडेल असा दावा केलेला नाही. ऊलट गेली वर्षभर खुर्चीसाठी धडपडणारे, अपमान गिळून खुर्चीला चिकटणारे सरकार बनले. गेले वर्षभर सत्ता टिकविण्याची धडपड करण्यातचं गेले. सरकार पडण्यापेक्षा त्यांनी सरकार टिकवून चालवून दाखवावं, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत राहू, असे ही ते म्हणाले. कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भष्ट्राचार झाला असून अधिवेशनात या भष्ट्राचाराचे वागाडे काढले जातील, म्हणून सरकारमध्ये अधिवेशनाला सामोरे जाण्याची हिंमत नाही, हे पूर्णपणे अपयशवी सरकार आहे, असेही ते एका प्रश्‍नाला उत्तर देताना म्हणाले..

कोरोना रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयश

जगातले पाच देश सोडले तर सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. अशी गंभीर परिस्थिती कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात होती. या काळात आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती.” अशी माहिती यावेळी बोलताना दिली”कोरोनाच्या काळात सरकार अपयशी ठरले आहे”असे सांगत पाटील म्हणाले, टटया सरकारच्या काळात सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही. शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाला आहे. कोणी म्हणत आज शाळा सुरू होईल, कोणी म्हणत होणार नाही. तोच गोंधळ आता दहावीच्या परिक्षेवरून सुरू आहे. शिक्षण क्षेत्राची अवस्था वाईट झाली आहे.”

संजय राऊत हे खूप मोठे व्यक्तिमत्त्व
यावेळी संजय राऊत यांच्याबद्द्ल विचारले असता ते म्हणाले, संजय राऊत खूप मोठे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्याबद्दल मी अलीकडे बोलणे बंद केले आहे. ”सरकार येतील आणि जातील पण, महाराष्ट्र संतांनी सामाजिक एकतेची जी विन विणली होती त्याला धक्का लावण्याचे काम मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू आहे”, असेही ते म्हणाले.

सरकारने मराठा आरक्षणाचे मातेरे केले
महाविकास आघाडीसरकारने मराठा आरक्षणाचे मातेरे करून टाकले. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कष्टाने आरक्षण मिळवून दिले होते, पण या सरकारला हे आरक्षण टिकवता आली नाही. शिक्षणातील आरक्षण यांनी आता रद्द केले. सरकार येतील आणि जातील पण, महाराष्ट्र संतांनी सामाजिक एकतेची जी विन विणली होती त्याला धक्का लावण्याचे काम मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...

सत्तेच्या लोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल..अरविंद केजरीवाल,भगवंत मान पुण्यात प्रचाराला येणार

पुणे- ' महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य...

प्रशांत जगतापांच्या राजीनाम्याचे वृत्त बदमाशीचे ..खोडसाळ

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप...

प्राजक्ता पटवर्धन यांना भाऊसाहेब स्मृती पाटणकर स्मृती पुरस्कार

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी गौरव पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य...