Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

उद्यापासून देशांतर्गत विमाने सुरू, पहाटे 4.30 वा. दिल्ली-कोलकाता पहिले विमान

Date:

नवी दिल्ली- देशात ६१ दिवसांपासून बंद असलेली अंतर्गत विमानसेवा सोमवारपासून सुरू होत आहे. पहिल्या दिवशी ११७३ विमाने उडतील, ज्यातून सुमारे १८ हजार प्रवासी प्रवास करतील. पहिले विमान इंडिगोचे 6 ई 282 राहील. ते दिल्लीच्या आयजीआय विमानतळाच्या टर्मिनल -३ वरून पहाटे ४.३० वाजता कोलकात्याकडे उड्डाण घेईल. मात्र, विमानसेवा सुरू करण्यावरून केंद्र आणि राज्यांत वाद निर्माण झाला आहे. सर्वाधिक संसर्ग असलेल्या महाराष्ट्र आणि तामिळनाडूने ३१ मेपर्यंत विमानसेवा सुरू करण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्राने लॉकडाऊन अधिसूचनेत दुरुस्तीस नकार दिला आहे. ९ राज्यांनी या विमानांनी येणाऱ्या प्रवाशांना क्वॉरंटाइन ठेवण्याचे जाहीर केले आहे. यात पंजाब, छत्तीसगड, केरळ, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि जम्मू-काश्मीरचा समावेश आहे. नागरी उड्डयनमंत्री हरदीपसिंह पुरी म्हणाले की, आरोग्य सेतू अॅपमध्ये ग्रीन स्टेटस असेल तर क्वॉरंटाइनची गरज नाही.
तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय उड्डाणे ऑगस्टपूर्वी सुरू करण्याचे संकेत मिळाले. नागरी उड्डयनमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी शनिवारी फेसबुक लाइव्ह वेळी ही माहिती दिली. ते म्हणाले, ऑगस्ट किंवा सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेने आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होऊ शकली नाही तरी काही प्रमाणात उड्डाणे सुरू करण्याचा प्रयत्न राहील. ही उड्डाणे सुरू होण्याची तारीख मी सांगू शकत नाही. मात्र, ही उड्डाणे ऑगस्टपूर्वी सुरू होतील. सर्वकाही सुरळीत राहिले तर जूनच्या मध्यात किंवा जुलैमध्येही उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे. असे असले तरी देशात मालवाहू जहाजे आणि मालवाहू आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आलेली नाही.
महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, दिल्ली, मप्रतून येणारे क्वॉरंटाइन : कर्नाटक
केरळ, कर्नाटक, आसाम, हिमाचल, आंध्र प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड, पंजाब आणि जम्मू-काश्मीरने म्हटले की, येणाऱ्या विमान प्रवाशांना ते १४ दिवस क्वॉरंटाइन करतील. कर्नाटकाने म्हटले की, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, दिल्ली आणि मध्य प्रदेशातून येणाऱ्यांना क्वॉरंटाइन व्हावे लागेल. सात दिवसांनंतर अहवाल निगेटिव्ह अाल्यास, त्यांना घरीही सात दिवस क्वॉरंटाइन राहावे लागेल. तर केरळने म्हटले, या विमानातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना क्वॉरंटाइन व्हावे लागेल, मग ते कामासाठी एक-दोन दिवसांसाठी येत असतील तरी. जम्मू-काश्मिरात रस्ते, रेल्वे आणि विमानाने येणाऱ्या लोकांना क्वॉरंटाइन व्हावे लागेल. दिल्ली विमानतळाने म्हटले की, प्रवाशाच्या शरीराचे तापमान ९८.७ अंश असेल तर विमानतळात प्रवेश दिला जाणार नाही.
कंपन्या महाराष्ट्राची तिकिटे बुक करताहेत, अधिकारी म्हणाले – तिकिटे रद्द होतील
गोएअर वगळता जवळपास सर्व विमान कंपन्या २५मेपासून मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरांतील विमानांची तिकिटे बुक करत आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकारने अद्याप देशांतर्गत विमानांना परवानगी दिलेली नाही. मुख्यमंत्री कार्यालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सद्य:स्थितीत विमानसेवा सुरू करता येणार नाही. ते म्हणाले की, कंपन्यांकडून बुक होणारी तिकिटे नंतर रद्दही होऊ शकतात. विशेष म्हणजे, राज्यात आंतरजिल्हा वाहतुकीवर बंदीनंतर नुकतीच रेल्वेने तिकिटेही रद्द केली होती. दरम्यान, डीजीसीएच्या सूत्रांनी सांगितले की, राज्य सरकारशी चर्चा सुरू आहे. दोन-तीन दिवसांत तोडगा निघेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बेळगावी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे   14 डिसेंबरला अनावरण

मुंबई- केंद्रीय दूरसंवाद तसेच ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य एम....

खडकवासल्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर विधानसभेत आ. तापकीरांची लक्षवेधी –

पुण्यासाठी स्वतंत्र ट्रॅफिक प्लॅनर पद व समन्वय समिती स्थापनेचे...

चंद्रकांतदादा पाटील यांची वाचनप्रेमी कोथरुडकरांसाठी आनंदाची बातमी

कोथरुड मतदारसंघातील वाचकांसाठी विशेष सवलत योजना पुणे-तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या...

निगडी ते चाकण व्हाया वाकड मेट्रो ‘डीपीआर’ मंजुरीसाठी आ. शंकर जगताप यांच्याकडून मागणी!

चापेकरवाडा पुनर्विकास प्रकल्प; जलनिस्सारण प्रकल्प, जकात अभय योजनेबाबत मांडल्या...