महापालिका नागरिकांचा अंत पाहते का? नगरसेविका अश्विनी कदम यांचा सवाल

Date:

पुणे-पहाटे दोन वाजता पर्वती जलकेंद्र येथे मोठा बिघाड झाल्यामुळे कोणतीही पूर्वकल्पना न देता संपूर्ण पर्वती परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे आज शिवदर्शन, लक्ष्मीनगर ,तावरे कॉलनी, अरण्येश्वर, पद्मावती, सहकारनगर, चव्हाण नगर, संभाजी नगर ,तळजाई, बिबवेवाडी, मार्केट यार्ड,महर्षी नगर परिसरामध्ये नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत.करोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेसाठी पाण्याची अत्यंत गरज असताना नागरिकांना अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे पिण्याच्या पाणी सुद्धा उपलब्ध होऊ शकले नाही त्यामुळे नागरिक अक्षरशा हतबल झाले व नागरिकांनी संताप सुद्धा व्यक्त केला.पुणे महानगरपालिकेचा हा अत्यंत भोंगळ कारभार त्याचा फटका आज वरील भागातील नागरिकांना बसला.पाण्यासाठी जनजीवन विस्कळीत झाले होते.
विद्युत पुरवठा करणारे बावीस केव्ही ची केबल फ्लॅश झाली असे कारण सांगण्यात येत आहे. परंतु अशा पद्धतीने विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर अन्य मार्गाने किंवा दुसरा पर्याय महानगरपालिकेकडे विद्युत पुरवठा करण्यासाठी उपलब्ध नव्हता ही अत्यंत खेदाची बाब आहे. पुणे महानगरपालिकेने समान पाणीपुरवठाच्या नावाखाली दोन हजार कोटी कर्जे काढलेल्या असताना नागरिकांवर अशी वेळ येते हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणूनच पुणे महानगरपालिका नागरिकांचा सहनशक्तीचा अंत पाहते का? असा सवाल राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी कदम यांनी उपस्थित केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...