पुणे- वीज बिले न भरल्याचे कारण देऊन ,वाढीव रकमेची बिल वसुली केली तर खबरदार , वीज ग्राहकाला १५ दिवसांची नोटीस देऊन त्यांची बाजू मांडण्याची संधी द्या त्याशिवाय थेट वीज तोडली तर मात्र आप च्या वतीने उग्र नागरी आंदोलन छेडले जाईल असा इशारा आप च्या वतीने देण्यात आला आहे. .आम आदमी पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदार संघांचे अध्यक्ष कृष्णा गायकवाड ,प्रवक्ते डॉ अभिजित मोरे तसेच संपर्क प्रमुख तुषार जंगम व त्यांचे सहकारी निलेश चाटी सर, सागर शिंदे, पर्वती मतदार संघांचे संघटक. विनोद जवळकर धनकवडी रिक्षा चालक सचिन जगताप यांनी या संदर्भात महावितरणच्या पद्मावती कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन निवेदन दिले आहे
या वेळी कृष्णा गायकवाड म्हणाले कि,’ कोवीड काळात लॉकडाऊन मुळे लोकांची या राज्य सरकार ने बिकट अवस्था केलेली असताना दुसरीकडे महावितरण कंपनी ने वाढीव बिले देऊन मनमानी कारभार चालवलेला आहे लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील पंधरा दिवसांची नोटीस न देता वीज कनेक्शन तोडून मीटर घेऊन जातात व पुन्हा ते जोडण्या साठी नवीन मीटर चे कनेक्शन घेण्यासाठी सांगितले जाते. अशा प्रकारच्या विविध नागरिकांच्या अडचणीवर आम आदमी पक्षाने बालाजीनगर धनकवडी येथे 7 दिवसांचे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनात नागरिकांच्या अभिप्राय व सह्यांची मोहीम घेऊन पद्मावती येथील महावितरण कंपनी चे कार्यकारी अभियंता काळुमाळी साहेब यांना निवेदन देऊन सांगण्यात आले कीजर नोटीस न देता कोणाचेही वीज कनेक्शन तोडू नये. अन्यथा संपूर्ण पुण्यात विविध मार्गानी आमचे आंदोलन घेण्यात येईल .

