Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

विकास आराखडा तयार करताना नव्याने समाविष्ट ग्रामीण भागावर अन्याय करु नका !आ. चंद्रकांतदादा पाटील (व्हिडीओ)

Date:

पुणे-राज्य सरकारने २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घाई-गडबडीने घेतला असून, या गावांच्या विकासासाठी एकही रुपयाचा निधी दिला नाही. त्यामुळे त्या सर्व २३ गावांच्या विकासासाठी नऊ हजार कोटी निधी द्यावा. तसेच विकास आराखडा तयार करताना ग्रामीण भागावर अन्याय करु नका, अशी भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडली. तसेच या सर्व २३ गावातील जी विकासकामं मंजुर होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, ती कामे पूर्ण करा, अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली.


पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या व पूर्वी समावेश झालेल्या ११ गावांच्या लोकप्रतिनिधींशी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज संवाद साधून त्यांच्या आशा,अपेक्षा आणि अडचणी जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार आणि ओबीसी आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर,. खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे आदी उपस्थित होते.


श्री. पाटील म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नियोजन शून्यपणे २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी ११ गावं समाविष्ट केली. त्या गावच्या डीपीआरचा अद्याप पत्ता नाही. त्यांच्या विकासासाठी निधीचा पत्ता नाही. त्यांच्या आधी देखील जी गावे समाविष्ट करण्यात आली, त्यांचाही विकास झालेला नाही. त्यामुळे नव्याने २३ गावे समाविष्ट करण्याचा आघाडी सरकारचा हट्ट का? हे कळायला मार्ग नाही. पण तरीही ही गावे समाविष्ट केल्यानंतर जे प्रश्न उपस्थित होतायत, त्यामध्ये प्रामुख्याने सदर गावांना विविध योजनांद्वारे जो निधी मंजूर झाला आहे, तो निधी जिल्हा परिषद जप्त करणार असेल, तर त्यांना कोण निधी देणार. यासोबतच राष्ट्रीय पेयजल सारख्या योजनेतून गावांना निधी मंजूर झाला असेल, तर त्याचे काय. त्यामुळे जी कामे मंजूर झाली आहेत. त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी सर्व कामे पूर्ण करावीच लागतील.

ते पुढे म्हणाले की, नव्याने समाविष्ट २३ गावांचा विकास आराखडा तयार करताना कोणत्याही प्रकारे घाई करु नये. तसेच पुणे महापालिकेत गावे समाविष्ट होणार असतील, तर त्याचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी देखील महापालिकेकडेच द्यावी. नगरविकास किंवा पीएमआरडीए कडून यात हस्तक्षेप नसावा.लोकसंख्येचा आणि भौगोलिक क्षेत्राचा विचार केल्यास, नवीन गावे समाविष्ट करण्याचा निर्णय अन्यायकारक आहे, असे परखड मत ही त्यांनी यावेळी मांडले.

राज्य सरकारच्या गावे समाविष्ट करण्याच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करताना श्री. पाटील म्हणाले की, राज्ये जेवढी लहान असतील, तेवढं प्रशासन चालवणं सोपं असतं, हा अटलजींचा आग्रह होता. यातूनच उत्तर प्रदेश, बिहार सारख्या राज्यांचे विभाजन होऊन नवीन राज्ये निर्माण झाली. त्यामुळे प्रशासकीय कारभार उत्तम चालावा, यासाठी लहान राज्ये अथवा महानगरपालिका असणे सोईचे होईल. पण तरीही सरकारने समाविष्ट केलेल्या गावांच्या विकासासाठी नऊ हजार कोटी रुपये राज्य सरकारने द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावच्या लोकप्रतिनिधींशी चर्चेअंती आ. पाटील यांनी गावांच्या समस्यांचा पाठपुरावा करण्यास एक नगरसेवक दिला जाईल. त्याबरोबरच सदर गावांच्या समस्यांसंदर्भात आयुक्त, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांच्यांसोबत बैठक घेऊन अडचणींचे निराकरण करण्यात येईल, असे सर्व २३ गावच्या लोकप्रतिनिधींना आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आश्वास्त केले. तसेच रिंग रोडच्या आखाणीसंदर्भातील तक्रारी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर मांडल्या. यावर संबंधित अधिकाऱ्यांशी भेट घेऊन त्याचे निराकरण करण्याचेही सर्वांना आश्वस्त केले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...