महानगरपालिकेतील २० हजार कोरोना वॉरियर्सना’विश्ववती चिकित्सालया’तर्फे’रस माधव वटी’चे वाटप

Date:

पुणे : “पुणे शहराच्या नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, कोरोनावर नियंत्रण मिळवता यावे, यासाठी पुणे महानगरपालिकेचा प्रत्येक कर्मचारी सैनिकासारखा लढतो आहे. या कोरोना वॉरियर्सना त्यांची रोगप्रतिकार क्षमता चांगली राहण्यासाठी श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटरतर्फे देण्यात येणारी रस माधव वटी उपायकारक ठरेल,” असे मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
परमपूज्य सद्गुरु श्री आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांच्या आशीर्वादाने व राजवैद्य समीर जमदग्नि यांच्या मार्गदर्शनाने चालविण्यात येत असलेल्या ‘चला… भारत सशक्त करूया’ मोहिमेअंतर्गत श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर, कोल्हापूर आणि क्विकहिल फाउंडेशनच्या वतीने पुणे महानगर पालिकेतील २० हजार कोरोना वॉरियर्सना (सफाई कर्मचारी, वार्ड ऑफिसर, पालिकेतील इतर कर्मचारी) रस माधव वटीचे वितरण उपक्रमाचा शुभारंभ मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाला. पालिकेच्या महापौर कार्यालयात झालेल्या या सोहळ्याला संयोजक वैद्य तुषार सौंदाणकर, वैद्य राहुल शेलार, क्विकहिल सीएसआर हेड अजय शिर्के, वैद्य श्रीकांत काकडे, वैद्य गिरीश शिर्के, वैद्य अभय जमदग्नी, वैद्य विनय सचदेव आदी उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “गेली साडेपाच महिने पालिकेचे अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करताहेत. इतरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी धडपडणाऱ्या महापालिकेतील या कोरोनायोद्ध्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी अनेक संस्था पुढे येताहेत. कोरोनाशी लढताना रोगप्रतिकार क्षमता चांगली राहण्यासाठी ही रस माधव वटी उपयुक्त आहे. याचा पालिकेतील जवळपास २० हजार अधिकारी-कर्मचारी यांना लाभ होईल.”
वैद्य तुषार सौंदाणकर म्हणाले, “सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टतर्फे या माधव रसायन, रस माधव वटीचे वितरण केले जात आहे. साथीचे आजार रोखण्यासाठी हे महत्वपूर्ण असून, हे औषध संशोधनपूर्ण आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाची याला मान्यता आहे. गेल्या चार महिन्यात विविध जिल्ह्यात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी आदी दीड लाख कोरोनायोद्ध्यांना या काढ्याचे व वटीचे मोफत वाटप करत आहोत.”
आरोग्य आरोग्य, क्षेत्रीय कार्यालय, घनकचरा व्यवस्थापन आदी विभागामार्फत सफाई कर्मचारी, वार्ड ऑफिसर, पालिकेतील इतर कर्मचारी या रस माधव वटीचे वाटप केले जाणार आहे. महापौरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षारक्षक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना रस माधव वटीचे वाटप करण्यात आले. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...