वन्यजीवांची तस्करी विरोधांत ठोस कारवाई करण्याची आवश्यकता — – राज्यपाल सी. विद्यासागर राव

Date:

पुणे : वन्यजीवांची हत्या आणि तस्करी करणाऱ्या विरोधात ठोस कारवाई करण्याची

आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

येथील यशदाच्या सभागृहात वन विभागाच्या उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी

कर्मचाऱ्यांच्या बक्षीस वितरण समारंभात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी

जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, वित्त नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, आ.

श्रीमती मेधा कुलकर्णी, आ. जगदीश मुळीक, वनविभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान

वनसंरक्षक सर्जन भगत, आदि उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल म्हणाले की, वाघ, अन्य वन्यजीवांना सापळा लावून पकडण्यात

येते. तसेच वीजेचा धक्का देण्याचेही प्रकार घडतात. याचे मला अतिशय वाईट वाटते.

याबाबत कायद्यानुसार ठोस कारवाई करावी तसेच संबंधितांना कडक शिक्षा झाली पाहिजे

यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन केले.

वन्यजीवांची हत्या आणि तस्कारी रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला

जात आहे. वन व्यवस्थापन व वन्य जीवांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वन

विभागांकडून केले जाणारे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर

राव यांनी केले.

राज्यात 1 जुलै, 2016 रोजी वन विभागाच्या वतीने एकाच दिवशी 2 कोटी

वृक्ष लागवडीचा उपक्रम अतिशय यशस्वीपणे राबविण्यात आला. एकाच दिवशी 2.82 कोटी

वृक्ष लगावडीचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. वृक्ष लागवडीच्या चळवळीची गती कायम

ठेवावी. पुढील वर्षी 3 कोटी, 2018 मध्ये 10 कोटी, 2019 मध्ये 25 कोटी वृक्ष लागवडीचे

उद्दिष्ट्य झाले पाहिजे असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

राज्याच्या काही भागांत वन्य प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष तीव्र

असल्याचे दिसते. या संघर्षाकडे कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच सौहार्दपूर्ण

भावनेने पाहून त्यांची मानसिकता व दृष्टीकोन बदलण्यासाठी प्रयत्न करावेत. हा संघर्ष

हाताळण्यासाठी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना सुध्दा सुरक्षा दिली जाईलच.

त्याचबरोबर कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाय योजना केल्या जातील, असे प्रतिपादन

राज्यपाल विद्यासागर राव यांनी केले.

यावेळी वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले की वन व वन्य जीव संरक्षण, संवर्धनामध्ये

उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या कार्यक्रमाचे

आयोजन करण्यात आले. चांगल्या कामाबद्दल पुरस्कार मिळाल्यानंतर पुरस्काराला साजेसे

काम भविष्यात निरंतर करावे. राज्यात एकाच दिवशी 2 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम

सर्वांनी यशस्वी केला. यापुढे 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. वृक्ष

लागवडीचे ईश्वरीय कार्य करावे लागणार आहे. यासाठी भौतिक साधने देवू. वनविभागाच्या

अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी वाहने, निवास व्यवस्था, प्रशिक्षण दिले जाणार आहे. सामान्य

जनतेला वन विभाग वरदान वाटेल असे काम केले पाहिजे, असे प्रतिपादन केले.

स्वागतपर भाषणात वनविभागाचे सचिव विकास खारगे म्हणाले की, 28 हजाराहून

अधिक कर्मचारी वन्य जीव सरंक्षणाचे काम करीत आहेत. वन विभागासमोर विविध आव्हाने

आहेत. ती पेलण्यासाठी 20 हून अधिक योजना सुरु केल्या आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर,

समाजातील सर्व घटकांना घेवून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी उपाय करण्यात येत

असल्याचे सांगितले.

याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते वनविभागात उत्कृष्ट कार्य केलेल्या

अधिकारी-कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले तसेच पश्चिम घाटातील मस्यसंपदा पुस्तिकेचे

प्रकाशन करण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा:पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक एकबोटेंना छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदी

छावा चित्रपटातील संभाजी महाराजांच्या मृत्युपूर्व दृश्यांनी कबरीबाबतच्या भावना तीव्र...

आगीमुळे ४०० केव्ही टॉवर लाइनला ट्रिपिंग; चाकण,पिंपरी, भोसरी, मंचर ग्रामीणमध्ये तासभर वीज खंडित

पुणे, दि. १५ मार्च २०२५: तळेगाव येथील पीजीसीआयएल ४०० केव्ही...

धायरीच्या मध्यवस्तीतील दुर्घटनाग्रस्त कचरा विलिनीकरण प्रकल्प न हलविल्यास जन आंदोलन

आम आदमी पक्षाचा इशारा पुणे:सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील मध्यवस्तीतील बेनकर...