सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याकरीता जिल्हा निवडणूक आराखडा-2020 जाहीर-राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील

Date:

पुणे, दि. 9: राज्य शासनाच्यावतीने कोवीड -19 ही जागतिक महामारी घोषीत करण्यात आल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर 18 मार्च 2020 पासून राज्यातील सहकारी संस्थाच्या सुरु असणा-या निवडणुका आहेत त्या टप्प्यावर थांबविल्या होत्या. कोविडच्या पार्श्वभुमीवर थांबविण्यात आलेल्या आणि निवडणुकीस पात्र असणा-या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर थांबविण्यात आलेल्या होत्या त्या टप्प्यापासून पुढे सुरु करण्याबाबत शासनाने 2 फेब्रुवारी 2021 रोजी आदेश दिलेले आहेत. या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याकरिता प्राधिकरणाने पूर्वतयारी केलेली असून एकूण चार टप्प्यामध्ये या निवडणुका घेण्याकरीता जिल्हा निवडणूक आराखडा-2020 जिल्हानिहाय जाहीर करण्यात आल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. पाटील म्हणाले, प्राधीकरण गठीत झाल्यापासून 31 डिसेंबर 2020 अखेर अ, ब, क, ड या वर्गीकरणाच्या एकूण निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांची संख्या 44 हजार 613 इतकी आहे. टप्पा क्रमांक 1 मध्ये यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया सुरु झालेल्या परंतु कोविडमुळे प्रक्रिया थांबविण्यात आलेल्या 3 हजार 213 सहकारी संस्थाचा समावेश आहे. या टप्प्यातील निवडणुका 15 फेब्रुवारी 2021 पासून निवडणूक प्रकिया सुरु करुन सामान्यपणे विहीत मुदतीमध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत. टप्पा क्रमांक 2 मध्ये 12 हजार 508 सहकारी संस्थाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. या टप्प्यातील निवडणुका 30 एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. टप्पा क्रमांक 3 मध्ये एकूण 14 हजार 301 सहकारी संस्थाचा समावेश असून या टप्प्यातील निवडणुका 31 मे 2021 अखेर पूर्ण करण्यात येणार आहेत. टप्पा क्रमांक 4 मध्ये एप्रिल ते डिसेंबर 2020 अखेरच्या एकुण 14 हजार 591 सहकारी संस्थाच्या निवडणुका घेण्यात येणार असुन या टप्प्यातील निवडणुका 30 जून 2021 अखेर पूर्ण करण्यात येणार आहेत. टप्पा क्रमांक 2 ते 4 बाबत निवडणूकीस पात्र असणा-या सहकारी संस्थांच्या मतदारांची प्रारूप मतदारयादी तयार करण्याकरीता अर्हता दिनांक हा टप्पानिहाय प्राधीकरणाकडून स्वतंत्र आदेशाने जाहीर करण्यात येणार आहे.
जिल्हा निवडणूक आराखडा-2020 मधील नमूद निवडणूक पात्र सहकारी संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतरच सन 2021 च्या ई -1 प्रमाणे पात्र एकूण 19 हजार 716 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत प्राधीकरण स्वतंत्र आदेश निर्गमित करणार आहे. निवडणुका या टप्पानिहाय विहीत कालमर्यादेमध्ये पूर्ण करण्याबाबत प्राधीकरणाकडून नियोजन व पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी म्हटले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.