Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लॉकडाऊनमुळे जिल्हयात अडकलेले परराज्य तसेच जिल्हयाबाहेरील नागरिक आपल्या मूळगावी रवाना

Date:


पुणे दि.10 : – लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी राज्य शासनाने धोरण निश्चित केले आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगवेगळया अधिका-यांकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदा-या देण्यात आल्या आहेत. यानुसार प्रशासनाकडून या नागरिकांची यादी तयार करुन संबंधित राज्यांकडे परवानगी घेण्याची प्रक्रीया गतीने सुरु करण्यात आली आहे. यानुसार नागरिकांना शासनाने विहीत केलेल्या नियमांनुसार तसेच सोशल डिस्टनंसिंगचे काटेाकोर पालन करुन प्रवासाला परवानगी देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातील सर्व यंत्रणा अत्यंत काळजीने याबाबतचे नियोजन करत आहे.
जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या या मोहिमेंतर्गत आज देहू येथील तात्पुरता निवारा केंद्रातील 20 नागरिकांना सोलापूर येथे रवाना करण्यात आले. स्वारगेट येथून दोन एसटी बसमधून 43 विद्यार्थ्यांना जळगाव येथे तसेच मौजे शिवे येथून 24 कामगारांना हिंगोली, नांदेड येथे रवाना करण्यात आले तसेच आणि कामशेत, तालुका मावळ येथून 110 मजूरांना 5 बसमधून लातूर, वाशिम येथे पोलीस व महसूल प्रशासनाच्या वतीने पाठविण्यात आले.
जिल्हा प्रशासनाने प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचविण्यासाठी हाती घेततेल्या उपक्रमातून यापूर्वी कोटा ( राजस्थान) मधून एकूण 74 विद्यार्थ्यांना धुळे आगाराच्या चार एसटी बसेसमधून स्वारगेट येथे आणण्यात आले तसेच प्रजापती ब्रम्हकुमारी, माऊंट अबू ( राजस्थान) येथे अडकलेल्या 80 साधकांनादेखील विशेष वाहनाने पुण्यात आणण्यात आले. शासनाच्या निर्देशानुसार त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर लंडनहून आलेल्या विमानाने पुणे जिल्हयातील 65 नागरिक आले. या नागरिकांना बालेवाडी येथील हॉटेल सदानंद रिजन्सी येथे अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
मुळशी तालुक्यातील पिरंगुट ग्रामपंचायत येथील परराज्यातील 24 मजूरांना त्यांच्या मूळ गावी जाण्याकरीता राजस्थान येथे बसमूधन पाठविण्यात आले. तसेच श्रमिक स्पेशल रेल्वेने वेगवेगळया निवारागृहांमध्ये असलेल्या मध्यप्रदेशातील 1093 मजूरांना उरुळी कांचन येथून रेवा ( मध्य प्रदेश) येथे पाठविण्यात आले, तर 1131 मजूरांना उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे विशेष रेल्वेने पाठविण्यात आले आहे.
राज्यांतर्गत मजूरांपैकी नांदेड जिल्हयातील 38 मजूरांना तीन वाहनांमधून तर शिरुर येथील तीन निवारागृहांमधील 38 मजूरांना विशेष बसने वाशिम जिल्हयातील त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...