अभिनेत्री कंगना रनोटवर महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर आज मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आला. ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली होती असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले. तसेच कंगनाला पालिकेकडून पाठवण्यात आलेली नोटीस रद्द करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीचे संपादक यांना जामीन न देणे ही चूक असल्याचे निरीक्षणं नोंदवले आहेत. या दोन निकालांवरुन फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.याविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे याचा राज्य सरकारला विसर पडला आहे. पोलिस, फौजदारी कायदे हे जनतेचे संरक्षण करण्यासाठी असतात. त्यांची छळवणूक करण्यासाठी नाहीत, हे जर न्यायालयाला सांगावे लागत असेल, तर आपली सदसदविवेक बुद्धी- संविधानाला स्मरून घेतलेली शपथ गहाण ठेवली का? हा प्रश्न निर्माण होतो,’ असा खोचक सवाल फडणवीसांनी विचारला आहे.
आपली सदसदविवेक बुद्धी- संविधानाला स्मरून घेतलेली शपथ गहाण ठेवली का?
Date:

