Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मिरगाव आणि आंबेघर येथे ‘एनडीआरएफ’च्या टीम पाठविण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरु – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

Date:

सातारा: गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पाटण तालुक्यातील मिरगाव आणि आंबेघर येथे दरड कोसळ्यामुळे मनुष्य हानी झाली आहे. मदतीसाठी ‘एनडीआरएफ’च्या टीम तिथे पोहचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील बहुतांश धरणातून विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे. यामुळे नद्यांच्या व ओढ्यांच्या पाणीपात मोठी वाढ झाली आहे. तरी नागरिकांनी नदीच्या तसेच ओढ्याच्या पात्रत जावू नये. डोंगरी भागात राहणाऱ्या नागरिकांनी दक्ष रहावे व काही अडचण आल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

मिरगाव ता. पाटण येथे भूस्खलनामुळे काही कुटुंब अकडले आहेत. या ठिकाणी  एनडीआरएफच्या पथकाला जाण्यासाठी अडचणी येत होत्या. या पथकाने कोयनेच्या बँक वॉटरमधून बचाव कार्य सुरु केले आहे. ओढ्याला पूर आल्यामुळे व दरड कोसळल्यामुळे आंबेघर येथे जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत, परंतु या ठिकाणी दरड हटविण्याचे काम प्रशासन करीत आहे.

कोयना धरणातून 45 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. तसेच इतर धरणांमधून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. हे सर्व पाणी कृष्णा नदीपात्रात येत असल्याने नदी काठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.

00000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...