हाफकिन महामंडळ पोलिओ लसींच्या ५०८ दशलक्ष डोसेसचे उत्पादन आणि पुरवठा करणार

Date:

मुंबई : येथील हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ पुढील काही वर्षात पोलिओ लसीच्या सुमारे 508 दशलक्ष इतक्या डोसेसचे उत्पादन आणि वितरण करणार आहे. यासाठी केंद्र शासनासह युनिसेफ आणि मोझाम्बिक देशाकडून महामंडळास नुकतेच पुरवठा आदेश प्राप्त झाले आहेत.

राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांनी हाफकिन महामंडळास नुकतीच भेट देऊन महामंडळाच्या सक्षमीकरणासंदर्भात ग्वाही दिली होती. मंत्री श्री. रावल यांच्यासह राज्यमंत्री मदन येरावार, विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख आदींच्या माध्यमातून महामंडळाच्या विकासासाठी व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. पोलिओ लस पुरवठ्यासह आता इतर लसी आणि ओषधांच्या निर्मितीसाठीही महामंडळाने पुढाकार घेतला आहे.

भारतातील पोलिओ लस तसेच इतर जीवरक्षक लसी व विविध प्रकारची औषधे बनविणारी हाफकिन महामंडळ ही अग्रगण्य कंपनी आहे. तसेच अशा प्रकारचा भारतातील हा एकमेव सार्वजनिक उपक्रम आहे. महामंडळास जागतिक आरोग्य संघटनेचे मानांकन प्राप्त आहे. मागील चार दशकापासून हाफकिन महामंडळ हे भारत सरकारच्या सार्वत्रिक लसीकरण मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावार पोलिओ लसीचे उत्पादन करुन देशभर पुरवठा करत आहे. भारतास पोलिओमुक्त करण्यामध्ये महामंडळाने मोठे योगदान दिले आहे. तसेच युनिसेफमार्फत महामंडळ आशिया, आफ्रिका व लॅटीन अमेरिका या खंडातील अनेक देशामध्ये पोलिओ लसीचा पुरवठा करत आहे. या माध्यमातून महामंडळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिओ निर्मूलनामध्ये मोठे योगदान देत आहे.

महामंडळाने स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी काढलेल्या 2019-2020, 2020-2021 व 2021-2022 या वर्षासाठीच्या पोलिओ लस पुरवठा निविदेमध्ये भाग घेतला व यशस्वी निविदाधारक ठरला आहे. त्यामुळे महामंडळास पुढील तीन वर्षासाठी (2019-20, 2020-2021 व 2021-2022) पोलिओ लसीच्या 368 मिलियन डोसेसचे (bOPV1&3) पुरवठा आदेश प्राप्त झाले आहेत. ज्याचे मूल्य 200.46 कोटी रुपये आहे. तसेच महामंडळास युनिसेफमार्फत 66 मिलियन डोसेसचे 2019-20 साठीचे पुरवठा आदेश प्राप्त झाले आहेत. ज्याचे मूल्य 50.86 कोटी रुपये आहे. याशिवाय अजून अतिरिक्त 60 मिलियन डोसेस पोलिओ लसीचे भारत सरकारकडून पुरवठा आदेश अपेक्षित आहे. 13 मिलियन डोसेस हे मोझाम्बिक या देशास निर्यात आदेश अपेक्षित आहेत. हे पुरवठा आदेश पूर्ण करण्याकरिता नियोजन करण्यात आले आहे. उत्पादनाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

वर्ष पोलिओ लस (bOPV1&3) पुरवठा आदेश मुल्य
2019-20 112.5 मिलियन डोसेस+अतिरिक्त 60 मिलियन डोसेस अपेक्षित भारत सरकार रु.93.84 कोटी
60 मिलियन डोसेस+6.2 मिलियन डोसेस (mOPV1) युनिसेफ रु.46.20 कोटी

रु.4.66 कोटी

13.35 मिलियन डोसेस मोझाम्बिक (निर्यात) रु.10.98 कोटी
2020-21 166 मिलियन डोसेस भारत सरकार रु.90.30 कोटी
2021-22 90 मिलियन डोसेस भारत सरकार रु.48.96 कोटी
एकूण 508मिलियन डोसेस रु.294.94 कोटी
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...