Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुणे मेट्रोच्या श्रेय वादावर देवेंद्र फडणवीसांनी टाकला पडदा

Date:

पुणे-कोथरूड येथील मेट्रोच्या कामाची चाचणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये झाली आहे. त्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. याबाबत आज पुण्यात माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुठलाही श्रेय वादाचा विषय नाही. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे ते आज सरकारमध्ये आहेत. ते निश्चितच त्यांच्या हस्ते होईल आणि दुसर्‍या कोणाच्या हस्ते होण्याचे कारण नाही. एवढ नक्की आहे की, जेव्हा हे काम पूर्ण होईल. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होईल आणि त्याला ते नकार देखील देणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी देखील दिला आहे. त्यामुळे पंतप्रधानाच्या हस्ते करुयात, सरकार येतात, जातात. त्यामुळे हा काही श्रेय वादाचा विषय नाही. मला आज एका गोष्टीचा आनंद आणि समाधान आहे. मी ज्यावेळेस मुख्यमंत्री झालो, त्यावेळी हा प्रकल्प रखडला होता. त्यामध्ये खूप वाद होते. त्या दरम्यान अनेक वेळा बैठका देखील घेतल्या. त्यानंतर काम सुरू झालं, याचा मला आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस तीन वेळा उठले दोन वेळा बसले .. कमीत कमी बोलले आणि म्हणाले पुण्यात कमीत कमी बोलणेच बरे …बऱ्याच प्रश्नांची त्रोटक उत्तरे ,लवकर परिषद आवरायची घाई असे वातावरण त्यांच्या पत्रकार परिषदेत पहिल्यांदाच दिसले .
मेट्रोच्या अधिकाऱ्यांचं कौतुक करावे, तेवढे कमीच –

तसेच ते पुढे म्हणाले की, देशभरात मेट्रोच काम सुरू आहे. त्या तुलनेत पुण्यातील मेट्रोच काम गतीने केले आहे. त्याबद्दल महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांचं कौतुक करावे, तेवढे कमीच आहे. आतापर्यंत जवळपास ६० टक्के काम झाले आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवाजी नगर येथे मेट्रो हब होणार होतं, मात्र या सरकारने केवळ मेट्रोस्टेशन करण्याचा निर्णय घेतला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्याबद्दल माहिती घेऊन बोलले. पण शिवाजीनगर हा आपला महत्वाचा भाग आहे. त्यामुळे तिथे मल्टी मॉडेल हब असणे, अत्यंत महत्वाचे आहे. मात्र त्याबद्दल नेमकी काही कारण असतील. त्यामुळे यावर काही कमेंट करणार नाही.

बिर्याणी आता शिळी झाला बाबा… –

पुण्यातील महिला पोलीस उपायुक्त यांनी मोफत बिर्याणी मागितली होती. त्याचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या प्रकरणी गृहमंत्र्यांनी अहवाल सादर होईल असे सांगितले. मात्र तो अहवाल अद्याप आलेली नाही. त्यावर फडणवीस म्हणाले की, बिर्याणी आता शिळी झाला बाबा… असे म्हटले .

सरकारने पुण्यातील व्यापाऱ्याला आणि उद्योगाला दिलासा दिला पाहिजे –

पुण्यात निर्बंध कायम आहेत. त्यावर ते फडणवीस म्हणाले की, सरकारने काही नियम ठरवले आहेत. काही निकष ठरवले आहेत. त्यामध्ये ५ टक्कयांवर ज्यांचा दर असेल, त्यांच्यावर आपण निर्बंध ठेवत आहोत. पण आता महिनाभर पुण्याचा दर ५ टक्क्यांच्या आतमध्ये आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये व्यापारी, दुकानदार करोनामुळे खूप अडचणीत आलेला आहे. त्यामुळे शेवटी त्यांची देखील एक लिमिट असते. माल विकला गेला नाही. तर तो खराब होतो. नवीन माल घेण्यास पैसा नाही. या सर्व परिस्थितीमध्ये नागरिक निर्बंध मान्य करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. समजा ५ टक्क्यांपेक्षा जास्त असता, तर निर्बंध योग्यच होते. मात्र महिनाभर झालं, ५ टक्केपेक्षा दर खाली आहे. निर्बंध ठेवणे योग्य नाही. त्यामुळे सरकारने पुण्यातील व्यापाऱ्याला आणि उद्योगाला दिलासा दिला पाहिजे. तसेच मदत केली गेली पाहिजे आणि त्यांच्यावरील निर्बंध कमी केले पाहिजे.

सगळच केंद्रावर टाकून कसं चालेल? –

लसीकरण वाढविण्याची मागणी होत आहे. मात्र केंद्राकडून कमी लस उपलब्ध होत आहे. त्यावर फडणवीस म्हणाले की, ओ हा फार जुना विषय आहे. केंद्राचा डायनॅमिक प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही आता देखील प्लॅटफॉर्म वर गेलात. तर राज्याला किती लसी आहेत आणि पुण्याला, नागपुरला किती लसी द्यायच्या, हे केंद्र ठरवित नाही. तर ते राज्य सरकार ठरविते. कालपर्यंत आपल्याकडे ४९ लाख लसी होत्या. त्यामुळे आता हे राज्याने ठरवायचे आहे. त्यामुळे सगळच केंद्रावर टाकून कसं चालेल?

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुतिन यांनी पाकच्या PM ना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले

मॉस्को :पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ शुक्रवारी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर...

मुंबईत येणार जगातील सर्वात मोठा GCC (जीसीसी) प्रोजेक्ट; ४५ हजार रोजगार निर्माण होणार.

मायक्रोसॉफ्टसोबत एआय सहकार्याची मोठी घोषणा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.12 -...

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील २ हजार २०७ उमेदवारांचे निकाल रद्द

पुणे, दि. १२ : ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी...

पुण्यातील चार तहसीलदारांसह दहा जण सस्पेंड

९० हजार ब्रास जादा उत्खनन कठोर कारवाईचे महसूल मंत्र्यांचे कठोर...