कोरोना वरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर देवेंद्र फडणवीसांचे जोरदार प्रहार (व्हिडिओ)

Date:

आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली उत्तरे

पुण्यातील खाजगी हॉस्पिटल ने लावलेली 1 कोटी ची रक्कम कमी केल्याचा आरोग्यमंत्री यांची माहिती

सुशांत सिंग आत्महत्या, कंगना राणावत संदर्भात सुरुवातीला गोंधळ

मुंबई- राज्यात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, राज्यातील परिस्थितीवरून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील चर्चेदरम्यान सरकारवर निशाणा साधला. “महाराष्ट्रात मुंबई पुणे महत्त्वाचं आहे. नाशिक औरंगाबाद, नागपूरही महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई पाहायचं, उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पाहायचं मग बाकी जिल्ह्यांना कोण वाली आहे?,” असा सवाल फडणवीस यांनी केला.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/237896010932407/

“मुख्यमंत्र्यांनी मुंबई पाहायचं, उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पाहायचं मग बाकी जिल्ह्यांना कोण वाली आहे? इतर ठिकाणं याच राज्यात आहेत. यांचा कोण वाली आहे? कोणता नवा पैसा सरकारनं या ठिकाणी दिला? त्या  ठिकाणी राहणारे लोकदेखील आपलेच आहेत ना. त्यांच्याकडेही लक्ष द्यावं. तिथे जाणं शक्य नसेल तर इथून आढावा घ्यावा. मुंबई पुण्याइतकंच मर्यादित तुमचं राज्य आहे का?,” असा सवालही फडणवीसांनी यावेळी केला. “करोनाच्या लढाईत ऑकसीजन बेडची कमतरता आहे. मेडिकल ओक्सीजन आता कोणीही तयार करू शकतं. पण काळाबाजार थांबवायला हवा. ऑक्सिजन अभावी लोकांचा मृत्यू होतोय. कोविडच्या लढाईतलं गांभीर्य सरकारला नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही मदतीला तयार आहोत. ही फक्त सत्तारुढ पक्षाची लढाई नाही. पण निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. परंतु त्याचं गांभीर्य दिसत नाही. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतलं नाही तर येत्या काळात रोज २ हजार लोकांना जरी रुग्णालयात न्यावं लागलं तरी तेवढी व्यवस्था उरणार नाही. आरटीपीसीआरच्या टेस्ट, आयसोलेशनच्या व्यवस्था राज्यात वाढवल्या पाहिजेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

१० लाखांचं बिल देऊ शकणाऱ्या करोना रुग्णाला कुठेही बेड मिळतो.जो गरीब आहे त्याला मात्र मरायला सोडून दिलं जातं आहे. असा घणाघाती आरोप फडणवीस यांनी केला. राज्य सरकार करोनाबाबत गंभीर नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. खासगी रुग्णालयांमध्ये भरमसाठ बिलं आकारली जात आहेत. ठाकरे सरकारचे निर्णय कागदावर आहेत त्याची अमलबजावणी होत नाहीत. गरीब रुग्णांनी काय करायचं असा संतप्त सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये करोना रुग्णांची मृत्यूसंख्या वाढली आहे. या सगळ्या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. करोनाच्या काळात आम्हाला टीका करण्याची हौस नाही मात्र सरकार काय करतं आहे ते दिसतच नाही त्यामुळे बोलावं लागतं आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

कल्याणच्या सभेत एकदा बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पोलिसांचा अपमान केल्याची आठवण विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीस यांनी करून दिली. हे पोलिस भांडी घासायच्या लायकीचे आहेत, अशा शब्दांत ठाकरे यांनी पोलिसांचा अवमान केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इज्जत आहे आणि पंतप्रधान आणि राज्यपालांना इज्जत नाही का, त्यांची इज्जत म्हणजे चिंध्या आहेत का, असा सवाल त्यांनी केला.

विधानसभेत बोलताना फडणवीस यांनी जोरदार प्रहार केले. कोरोनाकाळात सरकार कसे कुचकामी ठरले, यावर त्यांनी सडेतोड भाषण केले. ते म्हणाले की कंगना रानावतने मुंबई पोलिसांचा अपमान केला हे मान्य आहे.

आम्ही त्याचा निषेध केला. मात्र जेव्हा आपलेच नेते पोलिसांचा अपमान करत होते तेव्हा त्यांनी कोणी सवाल विचारला का? कल्याणच्या सभेत ठाकरे यांनी बोलताना हे पोलिस भांडी घासायच्या लायकीचे असल्याचे कसे काय बोलले? मात्र मनाला येईल त्याप्रमाणे बोलण्याचे स्वातंत्र्य आपल्यालाच आहे, असे कसे, असा सवाल त्यांन केला.

एखाद्या माध्यमाने विरोधात बातमी दिली तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे या सरकारचे धोरण आहे. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून राज्यपाल आणि पंतप्रधान यांच्याबद्दल जी भाषा वापरली जाते ती किती खालच्या पातळीवरची आहे, याचा कधी छगन भुजबळ तुम्ही विचार करणार की नाही, असे विचारत मुख्यमंत्र्यांनाच इज्जत आहे का आणि बाकिच्यांची इज्जत म्हणजे चिंध्या का, असे त्यांनी विचारले.

गृह खात्याबद्दल फडणवीस यांनी जोरदार बॅटिंग केली. कोविड सेंटरमध्ये अनेक महिलांवर अत्याचार झाले. त्यावर गृहमंत्री काय बोलणार? महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी दिशा कायदा हे सरकार आणणारे होते. त्याचे काय झाले? दिशा कायद्याची कॅबिनेटमध्ये दिशा कशी बदलली हे मला माहीत आहे. अजितदादा तुम्ही मास्क घालून हसता. पण ते आम्हाला कळतंय, असा टोला त्यांनी मारला. दूधदर वाढविण्याबाबत आम्ही आंदोलन केले. शेतकरी संघटनेचने राजू शेट्टी यांनी आंदोलन केले. आमचे जाऊद्या किमान त्यांच्या आंदोलनाची दखल घ्या. ते तुमच्या सोबत आहेत की नाही, हे मला माहीत नाही, असाही चिमटा त्यांनी काढला.

कोरोनाच्या परिस्थितीत मुंबई आणि पुण्याकडे लक्ष दिलं जाते. मात्र नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर ही महाराष्ट्रात आहे.
मुख्यमंत्री हे मुंबई पाहतात आणि उपमुख्यमंत्री हे पुणेम मग इतर शहरांकडे कोण पाहणार आढावा का घेतला जात नाही? पैसे का दिले जात नाही? तुमचं राज्य हे फक्त मुंबई आणि पुणे मर्यादित आहे का, अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रीय समाज पक्ष व काँग्रेस महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूका एकत्र लढणार

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ...

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...