‘भारतातली लोकशाही मेली’; राहुल गांधीं

Date:

  • कृषी कायद्यांवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल

केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्यानंतर या विधेयकांचं कायद्यात रुपांतर झालं आहे. मात्र, या तिन्ही कायद्यांना शेतकरी विरोध करत असून शेतकऱ्यांचं देशभर आंदोलन सुरु आहे. हे विधेयक संसदेत सादर केलं तेव्हापासूनच विरोधक आक्रमक आहेत. दरम्यान, आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यसभेत कृषी विधेयकं मंजूर करताना उपसभापतींनी विरोधक जागेवर बसले नव्हते असं म्हटलं होतं. उपसभापतींच्या दाव्याचं खंडन करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

केंद्र सरकारने शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तीनही विधेयकं गेल्या आठवड्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडली. ही विधेयकं दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आली. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून या विधेयकांचं कायद्यात रुपांतर झालं आहे.

दरम्यान, ही विधेयकं मंजूर करताना राज्यसभेत प्रचंड गदारोळ होता. प्रचंड गोंधळातच ही विधेयकं मंजूर झाली. यावर भूमिका मांडताना राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी असा दावा केला होता की, विधेयकं मंजूर करताना विरोधक जागेवर बसले नाहीत. मात्र, या संदर्भात इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने राज्यसभा टिव्हीच्या चित्रफितीवरून वृत्त प्रसिद्ध केलं. यामध्ये उपसभापतींच्या दाव्याच्या उलट दिसत आहे. या वृत्ताचा हवाला देत राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. “कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा आहेत. शेतकऱ्यांचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेरही दाबला जातोय. भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा,” असं म्हणत राहुल गांधी यांनी वृत्त ट्विट केलं आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...